AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | तुमच्या आयुष्यातील 4 खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय नाही

चाणक्याने आयुष्यातील कोणत्या गोष्टी कोणाला सांगू नये याबद्दल माहीती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Chanakya Niti | तुमच्या आयुष्यातील 4 खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय नाही
CHANKYA-NITI
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:15 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे विद्वान, शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी देखील होते. आचार्य यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून तेथील सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्या काळात आचार्य यांनी अनेक रचनाही केल्या होत्या.अर्थशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही पैसे गुंतवण्याचे बारकावे आणि पैशाशी संबंधित इतर गोष्टी आचार्यांकडून जाणून घेऊ शकता. तर जीवन कसे जागायचे याबद्दल आदर्श मांडले आहेत. त्यात लिहिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने माणूस सर्व समस्यांना सहजपणे सामोरे जाण्यास शिकू शकतो. चाणक्याने आयुष्यातील कोणत्या गोष्टी कोणाला सांगू नये याबद्दल माहीती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

तुमची कमजोरी सांगू नका

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी असतेच. पण हुशार लोक त्यांची कमजोरी कधीच कोणाला सांगत नाहीत. जर तुम्ही तुमची कमजोरी कोणाला सांगितली तर ती तुमच्या विरोधकांपर्यंत झपाट्याने पोहोचू शकते कारण एकदा तोंडातून शब्द निघाला की तो पसरायला जास्त वेळ लागत नाही. अशा वेळी तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना वेळ लागणार नाही.

इतरांची रहस्ये

अनेक वेळा लोक तुम्हाला विश्वासार्ह मानून त्यांचे विचार तुमच्याशी शेअर करतात, पण याचा अर्थ तुम्ही त्यांची गुपिते दुसऱ्याला सांगावीत असा नाही. असे केल्याने त्या व्यक्तीचा विश्वास तुटतो, तुमचे नाते बिघडते, तसेच तुमच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होतो.

पैशांची माहिती

तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी पैशांशी संबंधित माहिती इतर कोणाशीही शेअर करू नका. कधीकधी लोकांचे वाईट हेतू असू शकतात आणि ते तुमचे नुकसान करू शकतात.

धोरण

शत्रूचा पराभव करायचा असेल तर रणनीती पूर्णपणे गुप्त ठेवावी. जर एकदा शत्रूला तुमच्या रणनीतीची कल्पना आली, तर तुमची पैज तुमच्यावर उलटली जाईल. त्यामुळे या बाबतीत नेहमी काळजी घ्या.

इतर बातम्या :

‘या’ 3 राशीचे लोक असतात सर्जनशील विचारांचे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही

Diwali 2021 : दिवाळीला अष्टलक्ष्मी साधना केल्यास पैशाशी संबंधित प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याची सवय आहे का? हे तर दारिद्र्याचे लक्षण, 6 गोष्टींचा वापर टाळा

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक.
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा.
73 पैकी 39 आगांवर अजितदादांची राष्ट्रवादी विजयी
73 पैकी 39 आगांवर अजितदादांची राष्ट्रवादी विजयी.
खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली
खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली.
Padli Election Results : विश्वास पाटलांचे पुत्र सचिन पाटलांचा पराभव
Padli Election Results : विश्वास पाटलांचे पुत्र सचिन पाटलांचा पराभव.
मावळात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा! 20 वर्षांनी मिळाला विजय
मावळात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा! 20 वर्षांनी मिळाला विजय.
पनवेल जिल्हा परिषदेत 8 पैकी 4 जागांवर भाजपचा विजय
पनवेल जिल्हा परिषदेत 8 पैकी 4 जागांवर भाजपचा विजय.