AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येतात, त्याच्यापासून त्याने नेहमी दूरच राहिलं पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 6:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचा राजा धनानंदच्या दरबारामध्ये अपमान झाला होता, त्यानंतर चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या मदतीने धनानंदाची बलाढ्य राजवट उलथून आपल्या अपमानाचा बदला घेतला. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अनेक चुका करतो, त्यातून तो शिकतो. परंतु अशा काही चुका आहेत, ज्या केल्यानंतर माणसाला त्यातून सावरण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, त्यापासून माणसाने नेहमी दूरच रहावं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्ज – चाणक्य म्हणतात माणसाने गरज असेल तरच कर्ज घ्यावं, जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला तर तुमची चिंता देखील वाढते. चिंता वाढल्यामुळे आयुष्य जगणं कठीण होतं. त्यामुळे माणसाने नेहमी अंथरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ तुम्हाला घालता आला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

प्रिय व्यक्तींकडून होणारा अपमान – चाणक्य म्हणतात माणसाला जी व्यक्ती सगळ्यात प्रिय असते, अशा व्यक्तीकडून झालेला अपमान तो कधीही सहन करत नाही, त्यामुळे आपलं वर्तन नेहमी असंच असावं, ज्यामुळे आपल्या जवळचे व्यक्ती दुखावले जाणार नाहीत.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात माणसाची संगत कशी आहे, यावरून त्याची भविष्याची दिशा ठरत असते. एक चुकीचं संगत तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे माणसाने नेहमी चांगल्या माणसांची संगत ठेवावी. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जीवनाचं सार्थक होतं.

आर्थिक अडचण – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर त्यामुळे त्याची चिंता वाढते. त्यामुळे माणसाने उपभोगाच्या वस्तूंसाठी कमी खर्च केला पाहिजे. आपल्या गरजा काय आहेत? हे आधी ओळखलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न हटवण्याची भूमिका
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला अन्... काळजाला भिडणारा Video समोर
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?