AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं

चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात.

Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं
चाणक्य निती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 11:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांचा राजा धनानंदाच्या दरबारामध्ये अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी या अपमानाचा असा बदला घेतला की राजा धनानंद याला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. चाणक्य यांनी आपली बुद्धी आणि कुट नीतीच्या जोरावर राजा धनानंद याची सत्ता उलथवून चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विजेत्यांची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

कमी बोला – चाणक्य म्हणता जे लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात अशी लोक या जगावर राज्य करतात. तुम्ही जेव्हा कमी बोलतात आणि जास्त ऐकतात तेव्हा तुम्हाला त्याचा दुहेरी फायदा असतो. एक म्हणजे तुम्हाला जास्त ऐकण्याची सवय असेल तर तुम्हाला जगात काय चाललं आहे? लोकांची तुमच्याबद्दल काय मतं आहेत? याचा अंदाज येऊ शकतो, त्यापद्धतीने तुम्ही तुमच्या भविष्याकालीन योजना आखू शकतात. कमी बोलण्याचे देखील अनेक फायदे आहेत, चाणक्य म्हणतात ज्या लोकांना जास्त बोलण्याची सवय असते, असे लोक आपले भेद त्यांच्या नकळत शत्रूंना देखील सांगून मोकळे होतात, त्यामुळे अशा लोकांचा पराभव करणं किंवा त्यांच्याकडून एखादा भेद जाणून घेणं हे खूप सोपं काम असतं. त्यामुळे जास्त ऐकणं आणि कमी बोलणं हेच बुद्धिमान लोकाचं लक्षण आहे.

गर्व करू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या आयुष्यात यशस्वी झालात तर कधीही गर्व करू नका, कारण ज्या व्यक्तीला गर्व होतो, तो व्यक्ती आंधळा होता, त्याला आजुबाजूच्या कोणत्याही गोष्टी नीट दिसत नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तीचा पराभव करणं हे फार सोपं काम असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.