इतकी लोकप्रिय सीरिज की एकदा बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही, IMDb रेटिंग प्रचंड जबरदस्त
सर्वात जास्त लोकप्रिय वेब सीरिज, ज्यामध्ये ना कॉमेडी, ना कोणताही हसवणारा सीन, तरी देखील या सीरिजने IMDb वर 'पंचायत' सीरिजला टाकले मागे. कथा इतकी सुपरहिट की लोक बघायला लागले तर दिवसभर जागेवरून हलत नाहीत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासोबतच दर्जेदार आणि खऱ्या घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशाच वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘स्कॅम 1992’ ‘द हर्षद मेहता स्टोरी’. प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटूनही या सीरिजची लोकप्रियता कायम असून, तिची दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ती आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या वेब सीरिजपैकी एक मानली जाते.
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज भारतातील सर्वात गाजलेल्या शेअर बाजार घोटाळ्यांपैकी एका सत्यघटनेवर आधारित आहे. यात शेअर दलाल हर्षद मेहता यांचा सामान्य व्यक्तीपासून शेअर बाजारातील ‘बिग बुल’ होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्याची थरारक कहाणी मांडण्यात आली आहे. प्रत्येक भागात नवीन घडामोडी आणि धक्कादायक खुलासे होत असल्याने प्रेक्षक शेवटपर्यंत कथेशी जोडलेले राहतात.
या मालिकेतील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता प्रतीक गांधी यांचा दमदार अभिनय. त्यांनी साकारलेली हर्षद मेहता यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले. IMDb वर ‘स्कॅम 1992’ ला 9.2 इतके उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे ती भारतातील सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक मानली जाते.
पंचायत सीरिजला किती रेटिंग?
दुसरीकडे, ‘पंचायत’ हीदेखील प्रेक्षकांची अत्यंत आवडती वेब सीरिज आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या कॉमेडी-ड्रामा सीरिज इंजिनिअरिंग पदवीधर अभिषेकला नोकरीअभावी उत्तर प्रदेशातील एका गावात पंचायत सचिव म्हणून काम करावे लागते. गावातील साधे जीवन, मानवी नाती, विनोदी प्रसंग आणि भावनिक क्षण यामुळे या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
IMDb वर ‘पंचायत’ ला 9.0/10 रेटिंग मिळाले असून, तीही भारतातील सर्वोत्तम मालिकांमध्ये गणली जाते. मात्र, रेटिंगच्या बाबतीत ‘स्कॅम 1992’ ने थोडी आघाडी घेतली आहे.
या दोन्ही वेब सीरिज त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे लोकप्रिय ठरल्या असल्या, तरी ‘स्कॅम 1992’ ने वास्तववादी कथानक, मजबूत पटकथा आणि थरारक मांडणीच्या जोरावर प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. यावरून दर्जेदार कथा आणि प्रभावी सादरीकरण असेल तर प्रेक्षक अशा सीरिजनाही तितकाच प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
