AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाचे आयुष्यात तीन सर्वात मोठे शत्रू असतात. हे असे शत्रू असतात, जे माणसाचं आयुष्य हळुहळु संपून टाकतात आणि ते त्याच्या लक्षातही येत नाही.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत, त्या हळुहळु माणसाचं आयुष्य संपवतात आणि ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे माणसानं अशा स्थितीमध्ये नेहमी सावध असलं पाहिजे. चाणक्य पुढे असंही म्हणतात जे आपले थेट शत्रू असतात, ते आपल्याला माहीत असतात, ते आपलं नुकसानच करणार आहेत, हे आपण गृहित धरलेलं असतं, त्यामुळे आपण कायम अशा व्यक्तींपासून सावध राहतो. मात्र गुप्त शत्रू हे त्यांच्यापेक्षाही खरतनाक असतात, हे कधी समोरच येतच नाहीत, त्यामुळे तुमचं आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात स्वार्थी मित्र कधीही ठेवू नये, कारण असे लोक तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी मैत्री करतात. एकदा त्यांचा स्वार्थ साधला की ते तुमची साथ सोडून निघून जातात. असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमची फसवणूक करण्यासाठी देखील मागे पुढे पहात नाही. अशा लोकांमुळे तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

कर्ज – चाणक्य म्हणतात कर्ज देखील माणसाचा असा शत्रू आहे, जो हळुहळु माणसाला संपवून टाकतो. तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकत जातात, आणि तुम्ही कधी अडकला हे देखील तुम्हाला कळत नाही, त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर रहावं.

आजारपण – चाणक्य म्हणतात आजार पण हे देखील माणसाचा मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आजारावर उपचार करून त्याला समूळ नष्ट करणं गरजेचं असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.