AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाचे आयुष्यात तीन सर्वात मोठे शत्रू असतात. हे असे शत्रू असतात, जे माणसाचं आयुष्य हळुहळु संपून टाकतात आणि ते त्याच्या लक्षातही येत नाही.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत, त्या हळुहळु माणसाचं आयुष्य संपवतात आणि ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे माणसानं अशा स्थितीमध्ये नेहमी सावध असलं पाहिजे. चाणक्य पुढे असंही म्हणतात जे आपले थेट शत्रू असतात, ते आपल्याला माहीत असतात, ते आपलं नुकसानच करणार आहेत, हे आपण गृहित धरलेलं असतं, त्यामुळे आपण कायम अशा व्यक्तींपासून सावध राहतो. मात्र गुप्त शत्रू हे त्यांच्यापेक्षाही खरतनाक असतात, हे कधी समोरच येतच नाहीत, त्यामुळे तुमचं आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात स्वार्थी मित्र कधीही ठेवू नये, कारण असे लोक तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी मैत्री करतात. एकदा त्यांचा स्वार्थ साधला की ते तुमची साथ सोडून निघून जातात. असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमची फसवणूक करण्यासाठी देखील मागे पुढे पहात नाही. अशा लोकांमुळे तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

कर्ज – चाणक्य म्हणतात कर्ज देखील माणसाचा असा शत्रू आहे, जो हळुहळु माणसाला संपवून टाकतो. तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकत जातात, आणि तुम्ही कधी अडकला हे देखील तुम्हाला कळत नाही, त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर रहावं.

आजारपण – चाणक्य म्हणतात आजार पण हे देखील माणसाचा मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आजारावर उपचार करून त्याला समूळ नष्ट करणं गरजेचं असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....