AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी तुम्हाला कधीच सुखानं जगू देणार नाहीत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?

Chanakya Niti : या तीन गोष्टी तुम्हाला कधीच सुखानं जगू देणार नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
| Updated on: Jul 20, 2025 | 10:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचारही आजही अनेकांना प्रेरणा देतात. माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याच थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

चाणक्य म्हणतात की जगात अशा तीन गोष्टी आहे, या गोष्टीपासून माणसानं दूर राहिलं पाहिजे, त्यातच त्याचं भलं आहे. या गोष्टी कधीच माणसांना आनंदानं सुखानं जगू देत नाही. त्या गोष्टी कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं? जाणून घेऊयात

कर्ज – आर्य चाणक्य म्हणतात कर्ज ही अशी गोष्ट आहे, जी मणसाला त्याच्या आयुष्यात सुखानं कधीच जगू देत नाही. आयुष्यभर कर्जाचं ओझ माणसाच्या डोक्यावर असंत. कर्जाची चिंता त्याच्या मनात असते, त्यामुळे तो कधीच सुखानं जगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काहीही करा पण कधीच कर्जबाजारी होऊ नका असाल सल्ला आर्य चाणक्य देतात. आर्य चाणक्य म्हणतात पैशांचं असं नियोजन करा ज्यामुळे तुमच्यावर कधीच कर्जबाजारी होण्याची वेळ आली नाही पाहिजे. बचत करायला शिका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आजार – आर्य चाणक्य म्हणतात की जसं कर्ज हे माणवाचं शत्रू आहे, तसाच आजार देखील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाला किंवा एखादा आजार तुम्हाला असेल तुम्ही कधीच आनंदानं जीवन जगू शकणार नाहीत, तुमच्याकडे असलेला सर्व पैसा हा त्या आजारांवरील उपचारातच खर्च होईल, त्यामुळे उत्तम आरोग्य कमवा असा सल्ला चाणक्य देतात.

शत्रू – आर्य चाणक्य म्हणतात की तुमच्या आयुष्यात शत्रू असता कामा नये, तुम्हाला जर एखादा शत्रू असेल तर त्याची भीती कायमच तुमच्या मनात असते, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.