AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : श्रीमंत व्हायचयं? मग चाणक्यांचा हा मंत्र कायम लक्षात ठेवा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : श्रीमंत व्हायचयं? मग चाणक्यांचा हा मंत्र कायम लक्षात ठेवा
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 8:25 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाच्या आयुष्यात पैशांचं किती महत्त्व असू शकतं, याबाबत चाणक्य यांनी अनेक दाखले दिले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैसा नावाची गोष्टी ही सर्वात महत्त्वाची असते. तुमच्याकडे जर धन असेल संपत्ती असेल तर परके लोक देखील तुमचे असतात. मात्र जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचे नातेवाईक देखील तुमची साथ सोडतात, त्यामुळे प्रत्येकाने पैशांची बचत केलीच पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य पुढे म्हणतात, की जगात अशी एकही गोष्टी नाही की जी तुम्ही पैशांनी खरेदी करू शकत नाहीत. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येणारच नाही, आणि समजा आलंच तर तुम्ही त्याला पैशांच्या जोरावर सहज नष्ट करू शकतात. त्यामुळे पैसा हा माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पैशांची बचत – चाणक्य म्हणतात पैसा ही माणसाची गरज आहे. जर माणसाकडे पैसा नसेल तर तो आयुष्यात कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळाचा, पत्नीचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज असते. त्यामुळे तुम्ही महिन्याला जे पैसे कमवत असाल त्यातील 25 टक्के रक्कम तरी तुम्ही बचत केलीच पाहिजे.

पैशांची गुंतवणूक – चाणक्य म्हणतात तुम्ही बचत केलेले पैसे एकाच जागी ठेवले तर त्यामध्ये कधीही वाढ होणार नाही, तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, कारण त्यामुळे मिळणाऱ्या परताव्यातून तुमचा पैसा हा वाढत जाईल. मात्र गुंतवणूक करताना नेहमी सुरक्षित मार्गाला प्राधान्य द्या, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दान – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा पैसा कमावतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागतो. त्यामुळे तुम्ही जे पैसे कमावले आहेत, त्यातून काही पैशांचं गरजू लोकांना दान करा, त्यामुळे तुम्हाला बरकत प्राप्त होईल.

योग्य मार्गाने पैसा कमवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर चुकीच्या मार्गाने पैसा कमावला तर कदाचित तुम्ही कमी कालावधीत खूप पैसा कमवाल मात्र असा पैसा हा दीर्घकाळ तुमची साथ देणार नाही, त्यामुळे पैसा हा योग्य मार्गानेच कमावा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...