AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ गोष्टीत महिला पुरुषांपेक्षा पुढे, हजारो वर्षांपूर्वीच चाणक्य काय सांगून गेले?

चाणक्य यांच्या नीतिसूत्रांमध्ये स्त्रियांचे अनेक श्रेष्ठ गुण वर्णन केले आहेत. "स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा..." या श्लोकातून ते स्त्रियांची भूक, बुद्धिमत्ता, साहस आणि कामुकता यांचे वर्णन करतात. चाणक्य यांच्या मते, या सर्व बाबतींत स्त्रिया पुरुषांपेक्षा कित्येक पट श्रेष्ठ आहेत. हा लेख चाणक्य यांच्या या विचारांचे विश्लेषण करतो.

Chanakya Niti : 'या' गोष्टीत महिला पुरुषांपेक्षा पुढे, हजारो वर्षांपूर्वीच चाणक्य काय सांगून गेले?
चाणक्य नीती
| Updated on: Nov 26, 2024 | 1:40 PM
Share

आर्य चाणक्य ही जगातील एक थोर कुटनीतीतज्ज्ञ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती होती. श्रेष्ठ विद्वान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अर्थतज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. नीतीशास्त्रात मोलाची भर घालण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी सांगितलेले मार्ग, वचन आणि नीतीमूल्य आजही जसेच्या तसे लागू होतात. त्यांचे काही विचार कालबाह्य झालेले असले तरी सर्वच विचार टाकून देता येतील असं नाही. त्यांचा मानवी स्वभाव आणि मानवी व्यवहारावरही मोठा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांनी गृहस्थी जीवनावर अमूलाग्र चिंतन केलं आहे. त्यांचं हे चिंतन आजही जसेच्या तसे लागू होते.

चाणक्य यांनी दिलेल्या नीती नियमांचे पालन केल्यास व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होतो. म्हणूनच, आज अनेक वर्षे उलटली तरी चाणक्य यांच्या या नीती आणि श्लोकांची प्रासंगिकता आजही कायम आहे. चाणक्य स्त्रियांचे काही गुण सांगतात, पुरुषांपेक्षाही स्त्रीया किती श्रेष्ठ आहेत हे त्यातून दिसून येतं. चला तर मग, चाणक्य यांनी सांगितलेले स्त्रियांमधील हे गुण जाणून घेऊया.

स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोSष्टगुण उच्यते।।

चाणक्य यांच्या या श्लोकानुसार, भूक, लाज, साहस आणि कामाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ असतात.

स्त्रीणां द्विगुण आहारो

चाणक्य म्हणतात की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दोन पट जास्त भूक लागते. म्हणूनच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त खातात. हे त्यांचे शारीरिक रचनेमुळे होते. त्यामुळे त्यांना अधिक अन्नाची आवश्यकता असते.

बुद्धिस्तासां चतुर्गुणा

चाणक्य म्हणतात की, स्त्रिया बुद्धिमान असतात आणि यामध्येही त्या पुरुषांपेक्षा चार पट अधिक असतात. याशिवाय, स्त्रिया चतुर आणि समजदार असतात, त्यामुळे त्या प्रत्येक अडचणीला सहजपणे तोंड देऊ शकतात.

साहसं षड्गुणं

याचा अर्थ, साहसाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धाडसी आहेत. चाणक्य म्हणतात की, साहसाच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा सहा पट अधिक असतात.

कामोSष्टगुण उच्यते।।

चाणक्य म्हणतात की, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक कामुकतेची भावना असते. त्या पुरुषांपेक्षा आठ पट अधिक कामुक असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.