
भारतामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक असे नियम आहे ज्यांचे पानल करणे गरजेचे असते. ज्योतिषशास्त्रनुसार, सूर्य आणि चंद्र ग्रहण प्रत्येक वर्ष येतं. मान्यतेनुसार, सूर्य किंवा चंद्र ग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे चांगले काम करू नये. असे केल्यामुळे त्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. ग्रहणाचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर, देशावर आणि संपूर्ण जगावर दिसून येतो. लवकरच जगभरात चंद्रग्रहण दिसून येणार आहे. या वर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण येणार आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्र सिंह राशीमध्ये आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते.
चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुमच्या महत्त्वाचे कोणतेही काम करू नये असे केल्यामुळे तुमची प्रगती होत नाही. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये पूजा आणि मंत्रांचा जप केला जातो. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये चंद्रग्रहणानंतर दान करण्याची परंपरा आणि मात्र दान करताना काही विशेष नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या आयष्यातील संकट दूर होण्यास मदत होते आणि देवी देवतांचे आशिर्वाद प्राप्त होतो.
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, जो कोणी चंद्रग्रहणानंतर दान करतो, त्याच्या घरात नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी राहते. घरात अन्न आणि पैशाची कमतरता नाही. चंद्रग्रहणानंतर दान केल्याने जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात. अशा परिस्थितीत, चंद्रग्रहणानंतर कोणत्या वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी होळीचा सणही साजरा केला जाईल. भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण 14 मार्च रोजी सकाळी 9:29 वाजता सुरू होईल. हे चंद्रग्रहण दुपारी 3:29 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्याचा सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाही.
चंद्रग्रहणानंतर, ब्राह्मण, गरीब आणि गरजूंना तांदूळ दान करावेत. ग्रहणानंतर ब्राह्मण, गरीब आणि गरजूंना तांदूळ दान केल्याने घरात समृद्धी येते. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती वाढते. ग्रहणानंतर, दूध, साखर, पीठ, पांढरे कपडे आणि पांढरी मिठाई यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ असते. या दिवशी चांदी किंवा मोत्याच्या वस्तू दान कराव्यात. ग्रहणानंतर चांदी किंवा मोत्याच्या वस्तू दान केल्याने कुंडलीत चंद्र बलवान होतो. ग्रहणानंतर गरीब व्यक्तीला पांढरे मोती दान केल्याने नोकरी मिळते असे मानले जाते.