Narak Chaudas 2021 : नरक चतुर्थीच्या दिवशी ‘ही’ तीन कामे करण्यास चुकूनही विसरु नका

जेथे अलक्ष्मी निवास करते, तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. माता लक्ष्मीला घरी आणण्यासाठी अलक्ष्मीला बाहेर पाठवणे जरुरी आहे. यामुळे रुप चतुर्थीच्या दिवशी घराची साफसफाई करुन अलक्ष्मीला घराबाहेर काढले जाते.

Narak Chaudas 2021 : नरक चतुर्थीच्या दिवशी 'ही' तीन कामे करण्यास चुकूनही विसरु नका
नरक चतुर्थीच्या दिवशी 'ही' तीन कामे करण्यास चुकूनही विसरु नका
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 5:01 PM

मुंबई : कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला छोटी दिवाळी असते. या दिवसाला नरक चतुर्थी (Narak Chaturdashi) आणि रूप चतुर्थी (Roop Chaturdashi) आदि नावांनी ओळखले जाते. ज्योतिषांच्या मते नरक चतुर्थी दिवशी माता लक्ष्मीची मोठी बहिण अलक्ष्मीला घरातून बाहेर काढले जाते. यानंतर दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे घरी आगमन होते. शास्त्रामध्ये अलक्ष्मी देवीचा निवास गरीबी, क्लेश आणि अस्वच्छ ठिकाणी असल्याचे म्हटले आहे. तिला दुर्भाग्याची देवी म्हटले जाते. जेथे अलक्ष्मी निवास करते, तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. माता लक्ष्मीला घरी आणण्यासाठी अलक्ष्मीला बाहेर पाठवणे जरुरी आहे. यामुळे रुप चतुर्थीच्या दिवशी घराची साफसफाई करुन अलक्ष्मीला घराबाहेर काढले जाते. यंदा नरक चतुर्थी 3 नोव्हेंबर रोजी आहे. ज्योतिषांच्या मते प्रत्येक व्यक्तीने तीन कामं जरूर केली पाहिजे. (Diwali 2021, Do not do this three things in narak chaturthi)

ही तीन कामं जरूर करा

1. घरातून कचरा बाहेर काढा

नरक चतुर्थीच्या दिवशी घराची नीट साफसफाई केली पाहिजे. या दिवशी घराचा प्रत्येक कोपरा साफ करा आणि घरातील कचरा बाहेर काढा. घरामध्ये रंगांचे रिकामे डब्बे, रद्दी, फुटलेल्या-तडा गेलेल्या काचा, धातूची तुटलेली भांडी आदि सामान घरातून काढून टाका. याशिवाय घरातील तुटलेले फर्निचर किंवा सजावटीचे सामान असेल तर ते ही बाहेर काढा. माता लक्ष्मीच्या आगमनासाठी घरातील वातावरण स्वच्छ ठेवणे जरुरी आहे.

2. अंगाला तेल आणि उटणं लावा

घरातील प्रत्येक सदस्याला उटणं लावून शरीराची चांगल्या प्रकारे स्वच्छता केली पाहिजे. असे मानले जाते की या दिवशी शरीराला उटणं आणि तेल लावल्याने सौंदर्य आणि सौभाग्य प्राप्त होते.

3. यमदीप लावणे

नरक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चार वातीवाला मातीचा दिवा लावला पाहिजे. हा दिवा यमाला समर्पित असतो. असे मानले जाते की, हा दिवा लावल्याने अकाली मृत्यू आणि नरक यातनांतून मुक्तता मिळते. हा दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावर नाला किंवा कचऱ्याच्या ढिगाजवळ ठेवा. दिवा विझला की तात्काळ तो घरात ठेवून द्या.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अशी करा पूजा

संध्याकाळी घरातील प्रमुख व्यक्ती हरभरा डाळ, खीळ-बताशे, अगरबत्ती, पाणी, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन दिवा लावतात. दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावा आणि “ओम धूम धुमम् धुमावती स्वाः” या मंत्राचा जप करा. माता धुमावती (दारिद्र्याची देवी) कडे प्रार्थना करा की हे माता, आपल्या घरातून, कुटुंबातून आणि व्यवसायातून वर्षभर दारिद्र्य, रोग, दोष, वाईट नजर नाहिशी होवो. लोटाची प्रार्थना करून, ग्लास पाण्याने भरून घराच्या मुख्य दरवाजाच्या दाराच्या चौकटीवर ठेवून घरात प्रवेश करून नाल्याच्या बाजूला असलेल्या मुख्य दरवाजावर जळत असलेला अगरबत्ती, दिवा आणि दिवा लावा. असे केल्याने पूजकांच्या कुटुंबात आई धुमावतींचा आशीर्वाद वर्षभर राहतो.  (Diwali 2021, Do not do this three things in narak chaturthi)

इतर बातम्या

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीला कुठली वस्तू खरेदी करण्यासाठी कुठला मुहूर्त शुभ असेल, जाणून घ्या

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीच्या शुभ दिनी या मंत्रोच्चाराने मिळेल निरोगी आयुष्य, जाणून घ्या भगवान धन्वंतरीच्या पूजेची पद्धत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.