AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2021 | दिवाळीला विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते, जाणून घ्या

जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्ती आणि धान्याचं सुख मिळते. देवी लक्ष्मीची उपासना-पूजेचा दिवस म्हणजे दिवाळी जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण मानला जातो. असे मानले जाते की दीपावलीच्या सणाला देवी लक्ष्मीची पूजा केल्यास वर्षभर आर्थिक बळ टिकून राहते.

Diwali 2021 | दिवाळीला विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते, जाणून घ्या
vishnu-lakshami
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 25, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई : जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्ती आणि धान्याचं सुख मिळते. देवी लक्ष्मीची उपासना-पूजेचा दिवस म्हणजे दिवाळी जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण मानला जातो. असे मानले जाते की दीपावलीच्या सणाला देवी लक्ष्मीची पूजा केल्यास वर्षभर आर्थिक बळ टिकून राहते. देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्तीचा साठा भरतो आणि सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

दिवाळीच्या दिवशी रिद्धी-सिद्धी देणाऱ्या आणि आद्य पूजनीय मानल्या जाणाऱ्या गणपतीचीही विशेष पूजा केली जाते. ज्यांच्या कृपेने वर्षभरातील सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. अशा स्थितीत शुभ आणि लाभ मिळण्यासाठी सर्वजण विधिपूर्वक गणपतीची पूजा करतात, विशेषत: देवी लक्ष्मीची.

दिवाळीत या देवतांची विशेष पूजा केली जाते –

दिवाळीच्या पवित्र सणाला गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्याशिवाय धनाची देवता कुबेर, देवी काली आणि माता सरस्वती यांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. परंतु, या सर्वांसाठी केलेल्या विशेष पूजा करुन भगवान विष्णूची पूजा का केली जात नाही हा स्वतःमध्ये एक मोठा प्रश्न आहे. जो बऱ्याचदा लोकांच्या मनात येतो. तर भगवान विष्णूची पत्नी माता लक्ष्मीची पूजा संपूर्ण विधीनुसार लोक करतात.

दिवाळीच्या रात्री भगवान विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते ते जाणून घेऊया –

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह सर्व देवतांची विशेष पूजा केली जाते. पण, त्या रात्री भगवान विष्णूची पूजा केली जात नाही, कारण दिवाळीचा पवित्र सण चातुर्मासाच्या दरम्यान येतो आणि यावेळी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत असतात. अशा परिस्थितीत कोणत्याही धार्मिक कार्यात त्यांची अनुपस्थिती स्वाभाविक आहे. यामुळेच संपत्तीची देवी लक्ष्मी विष्णूशिवाय दिवाळीला लोकांच्या घरी जाते.

त्याचवेळी, गणपती जे देवांमध्ये प्रथमपुजनीय मानले जातात. त्यांच्यासह इतर देवांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधित्व करतो. पण, दिवाळीनंतर, जेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमधून उठतात, तेव्हा सर्व देवता पुन्हा एकदा श्रीहरीसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा करुन दीपावलीचा सण साजरा करतात, ज्याला देव दीपावली म्हणतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

PHOTO | Diwali 2021 : दिवाळीत ‘या’ पाच गोष्टी घरात आणल्याने घरात भरेल सुख-समृद्धीचे भांडार

PHOTO | Diwali 2021 : पाच पर्व घेऊन येत आहे दिवाळी, जाणून घ्या कोणत्या दिवसाच्या पूजेचे काय आहे महत्व

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ