AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : ग्रहदोषामुळे प्रगती थांबली आहे? दिवाळीत अवश्य लावा मातीची पणती

दिव्यांचा आणि रोषणाईचा सण दिवाळा अवघअया काहीच दिवसांवर आलेला आहे. या सणाला मातीचे दिवे ज्याला आपण पणती म्हणतो ते लावण्याचे विशेष महत्त्व आहे. या सणाला मातीचे दिवे लावल्याने ग्रहदोष दूर होतो. जाणून घेऊया मातीचे दिवे लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व.

Diwali 2023 : ग्रहदोषामुळे प्रगती थांबली आहे? दिवाळीत अवश्य लावा मातीची पणती
दिवाळीत पणतीचे महत्त्वImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 31, 2023 | 8:32 AM
Share

मुंबई : शरद पौर्णिमा झाल्यानंतर दिवाळीची (Diwali 2023) चाहूल लागायला सुरूवात होते. रंगेबीरंगी रांगोळी, वेगवेगळ्या आकाराचे मातीचे दिवे, सजावटीचे सामान, फटाके यांनी बाजारपेठा सजू लागतात. घरातील महिला वर्ग फराच्या तयारीला लागतात. गोडधोड खायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीसुद्धा उत्साहात असते. तसे तर वर्षभर अनेक सण साजरे होतात मात्र हिंदू धर्मात दिवाळी या पाच दिवसीय सणाला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा विधीनुसार केली जाते. या दिवशी लोकं नवीन कपडे परिधान करतात, इतर देवतांसह भगवान लक्ष्मीची पूजा करतात आणि संपूर्ण घर दिवे आणि रांगोळीने सजवतात. त्यानंतर दिवाळी निमीत्त बनवलेल्या फराळाचे आदान प्रदान होते.

दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लोकं आपले घर मातीच्या दिव्यांनी म्हणजेच पणत्यांनी पूर्णपणे सजवतात. पण तुम्ही कधी दिवाळीला फक्त मातीचे दिवे का लावले जातात यामागचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जोतिषी नचिकेत काळे यांच्याकडून जाणून घेऊया दिवाळीला फक्त मातीचे दिवे का लावले जातात.

दिवाळी साजरी करण्यामागील कारण

पौराणिक मान्यतेनुसार, 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत परतले, त्यानिमित्त शहरातील लोकांनी दिवे लावून आणि रांगोळी काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर दिव्यांनी उजळून निघाले होते. तेव्हापासून कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जाऊ लागला. या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच श्रीगणेश आणि देवी सरस्वती यांचीही पूजा केली जाते.

दिवाळीला मातीचे दिवे का लावले जातात?

मातीचे दिवे लावण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा माती आणि जमीनीचा कारक मानला जातो. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच माती आणि मोहरीच्या तेलाचे दिवे लावून मंगळ आणि शनि दोन्ही बलवान होतात. त्यामुळे शुभ फल मिळते. आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीचे मंगळ आणि शनि बलवान असतील तर त्याला धन, संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनात सर्व सुख प्राप्त होते.

तणाव दूर होतो

मातीचे दिवे लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते जी जीवनात आनंद टिकवून ठेवते. मातीचा दिवा हा पंच तत्वांचा निरूपण मानला जातो. खरे तर सर्व काही मातीच्या दिव्यात सापडते. पणती ही माती आणि पाण्यापासून बनवली जाते. ते प्रज्वलीत करण्यासाठी आग्नी लागते आणि हवेमुळे अग्नी प्रज्वलीत होते. त्यामुळेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर फक्त मातीचे दिवे लावले जातात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?