AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एक गाव जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, हैराण करणारं कारण आलं समोर

Diwali 2025: भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.

भारतातील असं एक गाव जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, हैराण करणारं कारण आलं समोर
diwali 2025
| Updated on: Oct 19, 2025 | 10:05 PM
Share

संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वांच्या घरी गोडधोड पदार्थ बनवले जात आहेत, अनेकजण फटाक्यांची खरेदी करत आहेत. प्रत्येकाने आपले घर सजवले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात हा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील सिहोतू पंचायतीतील अटियाला दाई गावात दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. या गावात अंगारिया जमातीचे लोक राहतात. हे लोक एका वृद्धाच्या वचनाचे पालन करून, दिवाळी साजरी करत नाहीत. समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी अंगारिया जमीतीतील एका वृद्ध व्यक्तीला कुष्ठरोग झाला होता. वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे अनेक लोकांना या आजाराने ग्रासले होते.

या आजारावर मात करण्यासाठी या व्यक्तीने दिवाळीच्या दिवशी एक खड्डा खणला आणि त्यात समाधी घेतली. समाधी घेताना या वृद्धाने गावकऱ्यांकडून एक वचन घेतले होते, जर कोणी भविष्यात येथे दिवाळी साजरी केली तर हे वचन शापात रूपांतरित होईल आणि हा आजार संपूर्ण गावात पसरेल. त्यानंतर हा आजार या गावातून नाहीसा झाला. याच कारणामुळे गावकऱ्यांनी दिवाळी साजरी करणे बंद केले. हीच परंपरा आजतागायत सुरु आहे.

या गावात अंगारिया जमीतीचे सुमारे 50 कुटुंबे राहतात. हे लोक दिवाळी साजरी करत नाहीत. लग्नानंतर या गावात आलेल्या सुनाही दिवाळी साजरी करत नाहीत. त्यांनीही समाजाची ही जुनी परंपरा पुढे चालू ठेवली आहे. काही तरुण रस्त्यावर फटाके वाजवतात, परंतु घरी दिवाळी साजरी केली जात नाही. अजूनही लोक त्या वृ्द्धाच्या शापाला भितात आणि दिवाळीला घरात पूजा करत नाहीत.

अटियाला दाई गावातील लोकांची ही केवळ परंपरा आहे की अंधश्रद्धा? हा प्रश्न अनेकांना उद्भवत आहे. देश सध्या प्रगती करत आहे, मात्र गावाखेड्यातील लोक अजूनही या अशा परंपरा पाळत आहेत. त्यामुळे अनेकजण अशा परंपरा नष्ट होणे गरजेचे आहे असं म्हणत आहेत.

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.