AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं काय कारण आहे?

केरळमध्ये दिवाळी साजरी न होण्यासाठीचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं हवामान. उत्तर भारतात पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यात दिवाळी सण साजरा केला जातो.

देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं काय कारण आहे?
देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं का आहे? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2022 | 3:56 PM
Share

तिरुवनंतपूरम: देशभरात दिवाळीचा (Diwali 2022) जल्लोष सुरू आहे. सर्वत्र आनंद आणि उत्सवाचं वातावरण आहे. मात्र, देशातील एक असं राज्य आहे की जिथे दिवाळीच साजरी होत नाही. ते राज्य म्हणजे दक्षिण भारतातील (south india) केरळ (Kerala) होय. केरळमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. त्यामागे काही पौराणिक कारणं आहेत. त्यावर टाकलेला हा प्रकाश.

केरळचा राजा आणि असूर महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. केरळमध्ये असूर महाबलीची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाल्याने केरळमध्ये दिवाळी सण साजरा केला जात नाही, अशी एक मान्यता आहे. त्याशिवाय केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याची आणखीही काही कारणं आहेत.

अनेक परंपरांच्या बाबतीत उत्तर आणि दक्षिण भारतात फरक आहे. दक्षिण भारतात असूरांबाबत सकारात्मकता आहे. तर उत्तर भारतात असूर हे खलनायक आहेत. रावणावरील प्रभू रामाने मिळवलेला विजय म्हणूनही दिवाळीकडे पाहिलं जातं. त्यामुळेही दक्षिण भारतात दिवाळी साजरी केली जात नाही.

केरळमध्ये दिवाळी साजरी न होण्यासाठीचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं हवामान. उत्तर भारतात पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यात दिवाळी सण साजरा केला जातो. तर केरळमध्ये असं होत नाही. केरळमध्ये हिवाळ्याची सुरुवात होत नाही आणि पावसाळाही संपत नाही. पाऊस होत असल्याने केरळमध्ये ना दिवे लावले जात, ना फटाके फोडले जात. म्हणजेच पाऊस हे सुद्धा दिवाळी साजरी न करण्यामागचं कारण आहे.

उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील हिंदूंच्या मान्यतेमध्येही फरक आहे. जसं की, उत्तर भारतात प्रभू रामचंद्राची पूजा करण्याची पद्धत आहे. पण केरळमध्ये तसं नाही. केरळमध्ये श्रीरामाऐवजी श्रीकृष्णाची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळेही उत्तर भारताप्रमाणे या ठिकाणी दिवाळीचा जल्लोष आणि उत्साह दिसून येत नाही.

दक्षिण भारतात द्रविड संस्कृती मुळापर्यंत रुजलेली आहे. त्यामुळे द्रविड संस्कृतीतील सण उत्सवच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. महाराजा बळीशी संबंधित ओणम हा सण केरळात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.