AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा ‘हे’ खास 5 उपाय

अधिक मासाला सनातन परंपरेत अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. पंचांगानुसार अधिक मास संपण्यापूर्वी पूजा, उपवास आणि दानधर्माद्वारे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही खास उपाय केले जातात. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा 'हे' खास 5 उपाय
TulsiImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 2:14 PM
Share

अ‍धिक मासात भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान कृष्ण यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक मासात भगवद्गीता आणि महापुराणाचे पठण केल्याने प्रचंड पुण्य प्राप्त होते. जे भक्त या पवित्र महिन्यात पौर्णिमा, अमावस्या आणि पुरुषोत्तम एकादशीला विहित विधींचे पालन करतात आणि भगवान हरीची पूजा करतात, त्यांना लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पंचांगानुसार अधिक मास 17 मे पासून सुरू झाला असून 15 जून 2026 रोजी संपणार आहे. चला, पुरुषोत्तम मास संपण्यापूर्वी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जातात,याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

‍विष्णूचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुळशीचे पूजन करणे

अधिक महिन्यात भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीची पूजा आणि सेवा केली पाहिजे. हिंदू श्रद्धेनुसार जी व्यक्ती अधिक मासात महिनाभर संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावतो आणि भगवान हरीच्या ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करत तुळशीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात, त्याला सर्व सुख प्राप्त होते.

पवित्र धर्मग्रंथांचे पठण केल्याने इच्छा पूर्ण होतील

हिंदू मान्यतेनुसा अधिक महिन्यात भगवद्गीता, पुराणे, गीता, विष्णू सहस्रनाम आणि इतर धर्मग्रंथांचे पठण किंवा श्रवण केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते. भगवान हरीची स्तुती करणाऱ्या या कथा आणि स्तोत्रांचे पठण केल्याने व्यक्तीचे दुःख आणि दुर्दैवापासून रक्षण होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

33 अनारसे दान करा

सनातन परंपरेनुसार 33 कोटी देवदेवतांची पूजा केली जाते. म्हणूनच पुरुषोत्तम महिन्यात 33 अनारसे बनवून ते दक्षिणेसह मंदिराच्या पुजाऱ्याला किंवा गरजू व्यक्तीला दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक महिन्यात अनारसे दान करणे हे भूमीदान करण्याइतकेच पुण्यकारक मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यातील एकादशी, द्वादशी, पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी अनारसे दान करणे अधिक शुभ आणि फलदायी ठरते. अनारसे बनवल्यानंतर प्रथम पूजेदरम्यान ते भगवान विष्णूला अर्पण करावेत आणि नंतर त्यांचे दान करावे.

या महामंत्राचा अवश्य जप करावा

पौराणिक मान्यतेनुसार पुरुषोत्तम महिन्यात योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा करून आणि त्यांच्या पवित्र मंत्रांचा जप केल्याने भक्ताला सुख आणि समृद्धी लाभते. अधिक महिन्यात भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, रोजच्या प्रार्थनेत तुळशीची माळ घेऊन भक्ती आणि श्रद्धेने “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.

जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर किमान पंचदीप दान करा आणि त्यांपैकी एक भगवान श्री विष्णूसमोर दिवा लावा, दुसरा तुळशीसमोर, तिसरा पिंपळाच्या झाडाजवळ, चौथा गोशाळेत आणि पाचवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यात लावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप