AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक करताना आणि जेवताना ‘या’ चुका करु नका!

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत. (Avoid These Mistakes While Eating)

स्वयंपाक करताना आणि जेवताना 'या' चुका करु नका!
food
| Updated on: Apr 10, 2021 | 1:15 PM
Share

मुंबई : देवी लक्ष्मीची पुजा केल्याने घरात सुख, संपत्ती, आनंद, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे नवस करतात. व्रत-वैतल्य करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वंयपाक घरातून किंवा जेवण बनवण्याच्या पद्धतीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

हिंदू धर्मात अन्नाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रातही अन्नाचा अनादर करणे पाप मानले जाते. यासाठी घरातील वडीलधारी किंवा ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणतात की कधीही अन्नाचा अपमान होऊ देऊ नका. विविध धर्मात जेवण बनवण्याची पद्धत त्याचे नियम हे वेगवेगळे असतात. त्यानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत.

रात्री खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक

अनेकांना मध्यरात्री झोपतेवेळी काही ना काही खाण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. बिघडलेल्या आरोग्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमजोर होते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी कोणत्याही गोष्टींचे सेवन करु नये.

रात्री हे पदार्थ खाणे टाळा

रात्रीच्या वेळी दूध पिणे हे फायदेशीर मानले जाते. मात्र दही खाणे हे तितकंच नुकसानकारक…कारण दही हे थंड असते. त्यामुळे तुम्हाला सर्दी- खोकला होऊ शकतो. त्यासोबतच रात्री जेवणात बटाटा, भात, जवस खाणे टाळावे. या प्रकारचे अन्न खाल्ल्याने घरात पैशाची समस्या उद्भवते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

दिशेची विशेष काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीवर सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीचा प्रभाव पडतो. त्यामध्ये दिशेचे योग हा विशेष मानला जातो. त्यामुळे नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेला तोंड करुन जेवण करावे. याशिवाय शूज आणि चप्पल घालून जेवण करु नये. तसेच स्वयंपाकघर ही जेवण करण्याची उत्तम जागा मानली जाते. यामुळे राहू ग्रह शांत होतो. तसेच आर्थिक स्थितीही चांगली राहते.

आंघोळ झाल्यावर जेवण बनवा

अनेक जण अंघोळ झाल्यावर अन्न शिजवतात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. यामुळे घरातील महिलांनी सकाळी अंघोळ करुन देवाची पूजा करुन स्वयंपाक करावा. तसेच चपातीचा तुकडा गाय, कुत्रे आणि कावळ्याला काढून ठेवा. यानंतर अग्निदेवताला भोग चढवल्यानंतर कुटुंबियांना जेवण द्या.

तुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका

कधीही तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका. तसेच पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली बसून जेवण करणे टाळा. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच कधीही अन्न टाकू नका. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आले ‘सुपरफूड’, वाचा याबद्दल अधिक !

Boost your Immune System : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे?, तर ‘या’ फळांचं सेवन करा…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.