चातुर्मासात गृहप्रवेशावर बंदी, पण नवीन घर खरेदी करता येतं का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्राचे नियम
हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. कारण या काळात भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात, त्यामुळे या दिवसांमध्ये विवाह आणि मुंडन यांसारखे शुभ विधी निषिद्ध मानले जातात, परंतु पूजा, नामजप आणि ध्यान यांचे महत्त्व वाढते. देवशयनी एकादशीपासून सुरू होऊन देवूथानी एकादशीपर्यंत चालणाऱ्या या चार महिन्यांच्या काळात नवीन घर खरेदी करण्यावर कोणतेही बंधन नसते; केवळ गृहप्रवेश केला जात नाही. चला तर मग याविषयी आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष आणि पवित्र मानला जातो. चातुर्मास हा चार महिने चालतो. याला काही ठिकाणी चौमास असेही म्हणतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान जगाचे पालनपोषण करण्याचे कार्य सोडून विश्रांती घेतात, म्हणूनच या काळाला देवांचा निद्राकाळ असेही म्हटले जाते. चातुर्मास आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवूठनी एकादशीला संपतो.
या वर्षी देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे. याचा अर्थ याच दिवशी चातुर्मास सुरू होईल. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी देवूठनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेतून जागे होतील आणि संपूर्ण जगाची आपली जबाबदारी पुन्हा स्वीकारतील. चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असल्यामुळे, विवाह, साखरपुडा, मुंडन, नामकरण, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये या काळात निषिद्ध मानले जातात. कारण या कार्यांमुळे शुभ फळ मिळत नाही. हा काळ पूजा, नामजप, ध्यान इत्यादींसाठी सर्वोत्तम आहे. तर चला जाणून घेऊयात की चातुर्मासात गृहप्रवेश निषिद्ध असूनही नवीन घर खरेदी करता येते का?
चातुर्मासात नवीन घर खरेदी करण्यावर कोणतेही बंधन नाही
ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात गृहप्रवेशास मनाई असली तरी, नवीन घर खरेदी करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. चातुर्मासात नवीन घर खरेदी करता येते. या चार महिन्यांत तुम्ही मालमत्तेचे व्यवहार बुक करू शकता, नावावर करण्याची प्रक्रिया देखील करू शकता किंवा खरेदी सुद्धा करू शकता. पण यामध्ये लक्षात घेण्यासारखं असे आहे की चातुर्मासात नवीन खरेदी केलेल्या घरात प्रवेश करताना काळजी घ्या, कारण या काळात गृहप्रवेश करता येत नाही आणि त्याशिवाय नवीन घरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते. या काळात गृहप्रवेश करणे किंवा नवीन घरात राहायला जाणे अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.
चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व
चातुर्मासात शुभ कार्ये पूर्णपणे थांबतात. हे चार महिने आत्मशुद्धी, आत्मसंयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी एक संधी मानले जातात. ऐहिक सुखांपासून दूर राहिल्याने व्यक्ती स्वतःमध्ये शिस्त, भक्ती आणि सेवाभाव विकसित करते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)