AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न जमवताना किती गुण जुळणे आवश्यक, जाणून घ्या ज्योतिषांकडून

हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नानंतर भविष्यातील समस्या टाळण्यासाठी त्यांची कुंडली बघितल्या जाते. कुंडलित मंगळ दोष, गुण दोष, नाडी दोष पहिले जातात.

लग्न जमवताना किती गुण जुळणे आवश्यक, जाणून घ्या ज्योतिषांकडून
| Edited By: | Updated on: Nov 19, 2024 | 3:13 PM
Share

हिंदू धर्मात लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या कुंडली बघितल्या जातात. भविष्यातील दुःख, त्रास आणि अडथळे टाळण्यासाठी कुंडली जुळवण्याला प्राधान्य दिले जाते. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नानंतर भविष्यातील समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांची कुंडली जुळवणे. दोघांच्या कुंडली जुळवताना गुणांची कमाल जुळणी, मंगळ दोष, नाडी दोष इत्यादी प्रामुख्याने दिसतात.

लग्नापूर्वी कुंडली जुळवणे का गरजेचे आहे?

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलित नाडी दोष, मंगळ दोष, गुण दोष इत्यादी असतील तर त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर वधू-वरांच्या आयुष्यात दुःख आणि समस्या येत राहतात. कुंडली मध्ये मंगळदोष, नाडीदोष आणि गुण दोष जुळले पाहिजेत असे ज्योतिषी सांगतात. ही जुळवा जुळव झाली नाही तर मुला मुलींचे आयुष्य दुःखाने आणि संकटांनी भरलेली असतात. एवढेच नाही तर त्यांचे लग्न देखील तुटू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार असे घडते कारण त्यांच्या कुंडलित मंगळ दोष, नाडी दोष आणि गुण दोष असू शकतात.

लग्नासाठी किती गुण जुळणे शुभ ?

मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नापूर्वी कुंडलीत प्रामुख्याने मंगळ दोष, नाडी दोष आणि गुण दोष दिसतात. कुंडलीत एकूण 36 गुण आहेत. जर मुलगा आणि मुलीचे 32 ते 36 गुण जुळले तर ती सर्वोत्कृष्ट कुंडली जुळली आहे असे मानले जाते.

लग्नासाठी किमान किती गुण जुळणे आवश्यक ?

लग्नासाठी किमान 18 गुण जुळणे आवश्यक मानले जाते. जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे गुण 18 पेक्षा कमी असतील तर त्यांना लग्नानंतर दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच हे लग्न लवकर तुटण्याची शक्यता असल्याचं मानलं जातं. लग्न करायचं असेल तर मुलगा आणि मुलगी यांचा मंगळ दोष आधी पाहिला जातो.

मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12 व्या घरात मंगळाची दशा किंवा महादशा असेल तर त्यानुसार मुलगा आणि मुलीची कुंडली बघितल्या जाते. यामध्ये प्रामुख्याने गुणदोष, नाडीदोष यांचा मेळ साधला जातो. हे जुळवून लग्न केले तर आयुष्यात अडचणी येत नाहीत असे मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.