AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रार्थनेदरम्यान किंवा पूजा करताना जांभई येणे शुभ आहे की अशुभ?

अनेकदा आपण पाहिलं असेल की पूजा करताना जांभई येते. त्यावेळी अनेक विचार डोक्यात येतात. हे असे होणे म्हणजे ते अशुभ मानले जाते किंवा आपली प्रार्थना व्यर्थ गेल्यासारखे वाटते, पण प्रार्थनेदरम्यान किंवा पूजा करताना जांभई येणे खरंच अशुभ असते का? त्याचा अर्थ काय असतो? हे जाणून घेऊयात.

प्रार्थनेदरम्यान किंवा पूजा करताना जांभई येणे शुभ आहे की अशुभ?
yawn during prayer or worshipImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 7:14 PM
Share

सनातन धर्मात, हिंदू धर्मात दैनंदिन पूजेला विशेष महत्त्व आहे. पूजा करणे म्हणजे पवित्र आणि महत्त्वाचा विधी मानला जातो. काही लोक घरी दररोज पूजा करतात, तर काहीजण मंदिरात जातात. नियमित पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते. पूजा करण्यासाठी प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे विधी असतात. तर काही लोक फक्त देवाचे स्मरण करतात आणि धूप किंवा अगरबत्ती लावतात. तर अनेकजण पोथी वाचतात. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का की पोथी वाचताना किंवा प्रार्थना करताना अनेकांना जांभई येते. त्यावेळी हे फार चुकीचं वाटतं. किंवा आपली पूजा व्यर्थ गेली असं वाटतं. पण यामागे असणारं खरं कारण माहित आहे का? तसेच पूजा करताना जांभई येणे अशुभ असते का? असे झाल्यास काय करावे? हे सर्व जाणून घेऊयात.

पूजा करताना जांभई का येते?

प्रार्थनेदरम्यान जांभई येण्याचे फक्त दोनच अर्थ असू शकतात. तुम्ही थकलेले आहात किंवा तुमचे मन दुसरीकडेच आहे. तुमच्या मनात काहीतरी चालले आहे, ज्यामुळे तुम्ही वारंवार जांभई देत आहात हे देखील शक्य आहे. काही लोकांना प्रार्थनेदरम्यान झोपही येते. हे चुकीचे नसले तरी, जर ते वारंवार होत असेल, तर ते स्पष्टपणे सूचित करते की तुम्ही प्रार्थनेच्या मूडमध्ये नाही आहात आणि त्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.

जेव्हा तुम्हाला जांभई येईल तेव्हा काय करावं?

जर तुम्हाला पूजा करताना जांभई येत असेल तर सर्वप्रथम स्वतःला दोष देऊ नका. किंवा अपराधी वाटून घेऊ नका. मन भटकू नये म्हणून मनाला जागृत ठेवा. एकाग्रतेसाठी ध्यान करा. जर पूजा करताना असे वारंवार होत असेल तर सर्वप्रथम तुमचे मन शांत करा. जेव्हा जेव्हा असे होईल तेव्हा पाच मिनिटे ध्यान करा. खोल श्वास घ्या.

जेव्हा मन एकाग्र असेल तेव्हा तुम्ही पूजा करताना देखील एकाग्र होऊ शकाल. याशिवाय, तुम्ही मंत्रांचा जप करूनही तुमचे मन शांत ठेवू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ओम किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप देखील करू शकता. या दरम्यान, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी विसरून जा आणि फक्त या मंत्रावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू तुमचे मन शांत होऊ लागेल आणि तुमची समस्या दूर होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......