AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुप मेहनत करूनही मिळत नसेल यश तर अवश्य करा केळीच्या झाडाचा हा उपाय

असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी-देवता वास करतात. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

खुप मेहनत करूनही मिळत नसेल यश तर अवश्य करा केळीच्या झाडाचा हा उपाय
केळीचे झाडImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 24, 2023 | 11:07 PM
Share

मुंबई : सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहेत. असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी-देवता वास करतात. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू (God Vishnu) या वृक्षात वास करतात असे म्हणतात. ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला केळीच्या झाडाशी संबंधित काही खास उपाय सांगणार आहोत.

आर्थिक संकट होईल दूर

कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापालट करू शकतो. यासाठी केळीच्या झाडाची मुळे घरी आणा. यानंतर ते मुळ गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा. नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ ठेवा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

पिवळे कपडे घाला

गुरुवारी स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे घाला. यानंतर केळीच्या झाडासमोर जा आणि भगवान विष्णूला तुमची इच्छा सांगा. पूजा करताना कुटुंबातील कोणीही तुमच्याशी बोलू नये याची विशेष काळजी घ्या. असे मानले जाते की भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

नोकरी-व्यवसायात लाभ होईल

ज्योतिष शास्त्रानुसार नोकरी-व्यवसायात अडचणी येत असतील तर केळीच्या झाडाची थोडीशी मुळे घेऊन लाल रुमाल किंवा कपड्यात बांधून ठेवा. यानंतर ते कापड कामाच्या ठिकाणी ठेवा. असे म्हणतात की या उपायाने काम-व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.