AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Traditions | टिळा लावण्यापासून ते आशीर्वाद घेण्यापर्यंत, जाणून घ्या 5 भारतीय परंपरांबद्दल विज्ञान काय सांगते

हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीचे हात जोडून किंवा पाय स्पर्श करून मोठ्यांचे आर्शीवाद घेतले जातात. या संस्कृतीचे पालन शतकानुशतके केले जात आहे. मात्र, आधुनिक युगात काही गोष्टी मागे पडत आहेत. अशा परिस्थितीत आजच्या तरुण पिढीला त्यांच्या संस्कृतीशी संबंधित नियमांचा आधार माहित असणे आवश्यक आहे.

Indian Traditions | टिळा लावण्यापासून ते आशीर्वाद घेण्यापर्यंत, जाणून घ्या 5 भारतीय परंपरांबद्दल विज्ञान काय सांगते
tilak
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 10:14 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीचे हात जोडून किंवा पाय स्पर्श करून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. या संस्कृतीचे पालन शतकानुशतके केले जात आहे. मात्र, आधुनिक युगात काही गोष्टी मागे पडत आहेत. अशा परिस्थितीत आजच्या तरुण पिढीला त्यांच्या संस्कृतीशी संबंधित नियमांचा आधार माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून या विधींमागील वैज्ञानिक तथ्यही समजू शकेल आणि ते आपल्या जीवनात लागू करताना मनात कोणताही संकोच राहू नये. चला तर मग जाणून घेऊयात भारतीय परंपरांशी संबंधित काही वैज्ञानिक तथ्ये.

नमस्कार करणे

भारतीय लोक आदरणीय व्यक्तीला हॉलो करण्यासाठी नमस्कार करण्यासाठी नमस्ते करतात. कोविडच्या काळात संपूर्ण जगाला नमस्तेचे महत्त्व समजले आहे. खरं तर जेव्हा आपण नमस्ते म्हणायला हात जोडतो तेव्हा आपली बोटे एकमेकांना स्पर्श करतात. या दरम्यान, एक्यूप्रेशरचा आपले डोळे, कान आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो. त्याच वेळी, हस्तांदोलन केल्याने, आपण समोरच्या व्यक्तीच्या हातातील बॅक्टेरियाच्या संपर्कात येण्याचा धोका वाढवतो. म्हणूनच की काय कोरोना काळात परदेशी लोकांनीही नमस्ते संस्कृती स्वीकारली पाहायला मिळाली.

पायांना स्पर्श करणे

भारतीय लोक वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाय स्पर्श करतात. यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. अहंकार नाहीसा होतो आणि मानसिकदृष्ट्या प्रेम, समर्पणाची भावना जागृत होते ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व देखील प्रभावी होते.

टिळा लावणे

पूजा करताना किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी कपाळावर टिळा लावला जातो. टिळा लावण्यामागील वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या डोक्याच्या मध्यभागी एक चक्र आहे. हे पाइनल ग्रंथीचे स्थान आहे. त्या ठिकाणी टिळक लावल्यास पाइनल ग्रंथीला चालना मिळते. त्यामुळे शरीरातील सूक्ष्म आणि स्थूल अवयव जागृत होतात. कपाळावर तिलक लावल्याने बीटाएंडॉर्फिन आणि सेरोटोनिन या रसायनांचा स्रावही संतुलित होतो. यामुळे मन शांत होते. एकाग्रता वाढते, राग आणि तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार विकसित होतात.

जमिनीवर खाणे

आजकाल जेवणाच्या टेबलावर जेवण करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पण आजही अनेक घरांमध्ये लोक आपल्या कुटुंबीयांसह जमिनीवर बसून जेवतात. मांडी घालून खाली बसणे हा योगसाधना आहे. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर एकत्र बसून जेवण केल्याने परस्पर प्रेम टिकून राहते.

सिंदूर भरणे

लग्नानंतर महिला सिंदूर भरतात. यामागील वैज्ञानिक सत्य समजून घेतले तर डोक्याचा ज्या भागावर सिंदूर लावला जातो तो भाग अतिशय कोमल असतो. या जागेला ‘ब्रह्मरंध्र’ म्हणतात. सिंदूरमध्ये पारा असतो, जो औषधाप्रमाणे काम करतो आणि महिलांचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त मानला जातो. यामुळे तणाव आणि निद्रानाशाची समस्या नियंत्रित होते. लैंगिक उत्तेजना देखील वाढते. यामुळेच अविवाहित मुली आणि विधवा महिलांना सिंदूर लावण्यावर बंदी आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा…

नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेल

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.