AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahamrutyunjay: जाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व, या पद्धतीने करा मंत्राचा जप

पवित्र श्रावण महिना (Shravan 2022) सुरू आहे. भगवान शंकराच्या (Bhagwan shanakar) पूजेसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. यामध्ये भगवान शंकराचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवाची उपासना करणे, शिवमंत्रांचा सतत जप करणे खूप शुभ आहे. श्रवणामध्ये महामृत्युंजय मंत्राच्या (Mahamrytyunjay Mantra benifits) जपाचे विशेष महत्त्व आहे. महामृत्युंजयाच्या जपाने भगवान शिव लवकर प्रसन्न […]

Mahamrutyunjay: जाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व, या पद्धतीने करा मंत्राचा जप
| Updated on: Jul 19, 2022 | 5:35 PM
Share

पवित्र श्रावण महिना (Shravan 2022) सुरू आहे. भगवान शंकराच्या (Bhagwan shanakar) पूजेसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. यामध्ये भगवान शंकराचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवाची उपासना करणे, शिवमंत्रांचा सतत जप करणे खूप शुभ आहे. श्रवणामध्ये महामृत्युंजय मंत्राच्या (Mahamrytyunjay Mantra benifits) जपाचे विशेष महत्त्व आहे. महामृत्युंजयाच्या जपाने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि संकटे लवकरात लवकर दूर करतात अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतांनुसार महामृत्युंजय मंत्र गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या मंत्राचा जप केल्याने मृत्यूवर विजय मिळवता येतो असे मानले जाते. याशिवाय या मंत्राचा जप वेगवेगळ्या कामांसाठी आणि कुंडलीतील दोष दूर करण्यासाठीही केला जातो.

महामृत्युंजय मंत्राचा जप करताना शास्त्रात काही खबरदारी सांगितली आहे, ज्यांचे पालन केलेच पाहिजे. चला जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा जप करताना कोणती काळजी घ्यावी.

महामृत्युंजय मंत्राचा जप करताना ही खबरदारी घ्या

महामृत्युंजय मंत्र हा शास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मंत्र मानला जातो. त्यामुळे या मंत्राचा जप करताना उच्चाराची विशेष काळजी घ्यावी. शुद्ध शब्दांनी मंत्राचा जप केल्यास त्याचा लाभ लवकर होतो.

महामृत्युंजय मंत्राचा जप नेहमी निश्चित संख्या लक्षात घेऊनच करावा. विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी संख्यांची काळजी घ्यावी. ज्याप्रमाणे कोणताही गंभीर आजार किंवा अकाली मृत्यूचे दोष टाळण्यासाठी या मंत्राचा जप लाभदायक आहे. यासाठी किमान दीड लाख वेळा मंत्रांचा जप करावा असे शास्त्रात सांगितले आहे.

महामृत्युंजय मंत्राचा जप करताना केवळ रुद्राक्षाच्या मणी वापराव्यात. रुदक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. अखंड मंत्रोच्चार करताना पूजेच्या ठिकाणी धूप आणि दिवे लावावेत. महामृत्युंजय मंत्राच्या वेळी मंद आवाजाने जप करणे अधिक फलदायी असते.

महामृत्युंजय मंत्राचा जप करताना शिव आणि माता पार्वतीची मूर्ती असावी. महामृत्युंजय मंत्राचा जप करताना शिवलिंगावर पाणी, दूध, दही आणि मध यांचा सतत अभिषेक करावा. या सिद्ध मंत्राचा जप नेहमी पूर्व दिशेला बसून करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा संकल्प केल्यावर कधीही मांसाहार करू नये. महामृत्युंजय मंत्राचा जप करताना मन स्थिर ठेवावे. मंत्रांचा उच्चार करताना ध्यान इकडे तिकडे भटकू देऊ नये.

महामृत्युंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.