AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या

आजकाल घर सजवताना अनेकजण काचेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे घरांना एक आधुनिक आणि आलिशान रूप प्राप्त होते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार काच ही एक अत्यंत संवेदनशील वस्तू मानली जाते? चला तर मग आजच्या लेखात आपण घरात काच लावण्याचे महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घेऊयात.

घरात काच लावण्यापूर्वी 'हे' वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा  वाढू शकतात समस्या
Glass for homeImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 09, 2026 | 4:52 PM
Share

आजच्या युगात प्रत्येकाला स्वत:चे स्वप्नातलं घर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवायचं असतं. कारण त्यामध्ये प्रत्येकाच्या भावना असतात. अशातच काहीजण घर सजवतान काचेचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. ज्यात घराच्या एका कोपऱ्यात मोठे आरसे, काचेच्या खिडक्या आणि वेगवेगळ्या आकारांचे आरसे घराला केवळ आधुनिक रूपच देत नाहीत, तर जागा अधिक मोठी आणि मोकळी असल्याचा आभास निर्माण करते. मात्र वास्तुशास्त्रानुसार, काच योग्य दिशेत आणि योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की चुकीच्या ठिकाणी ठेवलेली किंवा लावलेली काच घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करू शकते आणि कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकते. चला तर मग जाणून घेऊया की घरात काच लावण्यापूर्वी कोणते वास्तु नियम लक्षात ठेवले पाहिजेत.

काचेची योग्य दिशा कोणती मानली जाते?

वास्तुशास्त्रानुसार घरात काच किंवा आरसे ठेवण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा सर्वात शुभ मानल्या जातात. असे मानले जाते की या दिशांमध्ये लावलेली काच सकारात्मक ऊर्जा वाढवते. मात्र दक्षिण आणि पश्चिम दिशांमध्ये मोठे आरसे लावणे टाळावे, कारण धार्मिक मान्यतेनुसार यामुळे ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो.

मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आरसा ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासमोर थेट मोठी काच किंवा आरसा ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा परावर्तित होऊ शकते. जर मुख्य दरवाजाजवळ आरसा ठेवायचाच असेल, तर तो अशा प्रकारे लावा की त्याचे प्रतिबिंब थेट दरवाजावर पडणार नाही.

बेडरूममध्ये आरसा लावताना काळजी घ्या

वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये काच किंवा आरसे लावण्याबाबतही विशिष्ट नियम आहेत. असे मानले जाते की झोपताना आरशात पलंगाचे प्रतिबिंब दिसू नये. असे म्हटले जाते की यामुळे मानसिक अस्वस्थता, तणाव आणि झोपेशी संबंधित समस्या वाढू शकतात. जर खोलीतील कपाटावर आरसा ठेवला असेल आणि त्यातून पलंग दिसत असेल, तर रात्री तो पडद्याने किंवा कापडाने झाकण्याची शिफारस केली जाते.

तुटलेली किंवा तडकलेली काच ताबडतोब काढून टाका

तुटलेली, तडकलेली किंवा चिरा पडलेली काच घरात कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून घरामध्ये कोठेही तडकलेली काच आढळली, तर ती शक्य तितक्या लवकर बदलणे उत्तम ठरते.

स्वयंपाकघरात आणि देव्हाऱ्यात काचेचा वापर

वास्तूनुसार स्वयंपाकघरात जास्त प्रमाणात काच वापरणे टाळावे. तसेच देव्हाऱ्यातही आरसे लावण्याची शिफारस केली जात नाही. धार्मिक श्रद्धेनुसार देवघर हे शांत ऊर्जेचे स्थान मानले जाते, त्यामुळे तिथे अनावश्यक काच किंवा परावर्तित होणाऱ्या वस्तू टाळल्या पाहिजेत.

काच स्वच्छ आणि चमकदार ठेवा

वास्तुशास्त्रामध्ये स्वच्छतेलाही विशेष महत्त्व दिले जाते. धूळ लागलेली, डाग असलेली किंवा धूसर काच सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करते असे मानले जाते. त्यामुळे घरातील आरसे आणि काच दररोज स्वच्छ करणे चांगले मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा