AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips for Family | घरात होणाऱ्या सततच्या वादामुळे त्रस्त आहात, मग वास्तुशास्त्रातील हे 5 उपाय नक्की करा

तुम्ही काही वास्तु टिप्स वापरु शकता, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात कोणताही त्रास टाळता येईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वास्तू टिप्स.

Vastu Tips for Family | घरात होणाऱ्या सततच्या वादामुळे त्रस्त आहात, मग वास्तुशास्त्रातील हे 5 उपाय नक्की करा
house
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 11:40 AM
Share

मुंबई : अनेक घरांमध्ये सतत वाद होत असतात. अनेक कुटुंबात मारामारी, भांडणे सर्रास पाहायला मिळतात. या भांडणांची अनेक कारणे असू शकतात परंतु कुटुंबात एकत्र राहण्यासाठी हे वाद दुर होणं गरजेचे असते. हे वाद दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला मदत करते. तुमच्या घरातील अनेक गोष्टी वास्तुदोषासाठी कारणीभूत असतात.

अशा परिस्थितीत तुम्ही काही वास्तु टिप्स वापरु शकता, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनातील त्रास टाळता येईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वास्तू टिप्स.

खोलीत मीठ ठेवा वास्तुशास्त्रानुसार मीठामध्ये पंचमाहाभूत असतात. म्हणजेच आपली पृथ्वी ज्या 5 तत्त्वांपासून बनली आहे त्यांपासूनच मीठ तयार झाले आहे. जर घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता उर्जा असते तर ती मीठामुळे आपल्याला काढता येते. त्यासाठी खोलीच्या एका कोपऱ्यात तुम्ही रॉक मिठाचा तुकडा ठेवू शकता. या कोपऱ्यात एक महिना मीठ सोडा. एक महिन्यानंतर, ते काढून टाका आणि रॉक मिठाच्या नवीन तुकड्याने बदला.

घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित स्वच्छ करा वास्तूनुसार कुटुंबात शांती राहण्यासाठी घराची योग्य प्रकारे साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. दररोज घराचा प्रत्येक कोपरा योग्य प्रकारे स्वच्छ केल्याची खात्री करा. तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.

घरात आरसा लावा घरामध्ये जास्तीत जास्त आरसे लावावेत. यामुळे तुमचे घर सुंदर तर बनवेलच पण तुमच्या घराला चांगली ऊर्जाही देईल. आरसा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो असे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सर्वांना फायदा होईल आणि भांडणे कमी होतील. घरात कोणतेही संकट येणार असेल तर घरातील काचेची गोष्ट पहिली तुटते किंवा काचेला तडा जातो अशी मान्यता आहे.

एक लहान कारंजे ठेवा जर तुमच्या घरात छोटीशी बाग असेल किंवा तुमच्या घरात अशी जागा असेल तर तुम्ही तिथे कारंजे ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरामध्ये वाहणारे पाणी सकारात्मक ऊर्जा आणू शकते.

भगवान बुद्धाची मूर्ती ठेवा भगवान बुद्ध शांतीचे प्रतिनिधित्व करतात.याच कारणामुळे अनेक लोक भगवान बुद्धांच्या मूर्ती घरात ठेवतात. तुम्ही त्यांना बाल्कनीत किंवा तुमच्या घराच्या आत, राहत्या जागेत ठेवू शकता. भगवान बुद्धाची मूर्ती तुमच्या घरात खूप सकारात्मकता आणि शांती आणेल.

संबंंधीत बातम्या :

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा

Lord Vishnu Worship Method : संकटातून मुक्तता, मृत्यूनंतर मोक्ष हवा असेल तर भगवान विष्णूला ही फुल अर्पण करा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.