AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Last Solar Eclipse of 2021 | सावधान! सूर्यग्रहणाचा शरीरावर होणार वाईट परिणाम, या गोष्टी करणं टाळाच

असे मानले जाते की सूर्यग्रहण दरम्यान, नकारात्मक किरण वातावरणात असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात या काळात काय काळजी घ्यावी 

Last Solar Eclipse of 2021 | सावधान! सूर्यग्रहणाचा शरीरावर होणार वाईट परिणाम, या गोष्टी करणं टाळाच
Last Solar Eclipse of 2021
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 9:24 AM
Share

मुंबई : अवकाशात होणाऱ्या घटनांचा मनावी आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. अशीच एक खगोलीय घटना म्हणजे ग्रहण. या गोष्टील पुराणांमध्ये खूप महत्त्वप्राप्त आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही फक्त एक खगोलीय घटना आहे. पण शास्त्रांमध्ये या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे सूर्यग्रहणाचा प्रभाव चंद्रग्रहणापेक्षा जास्त मानला जातो. 2021 सालातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवार, 4 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 वाजता संपेल. असेही मानले जाते की सूर्यग्रहणाचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी तुम्ही कोणता काळजी घ्याल.

पचनक्रियेवर परिणाम पुरांणामध्ये सूर्यग्रहण काळात खाणे किंवा पिणे वर्ज केले आहे. असे मानले जाते की ग्रहण काळात वातावरणात खूप नकारात्मकता असते. हे अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचते, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. अशा स्थितीत जरी अन्न खावे लागत असेल तर अन्न खाण्यापुर्वी तुळशीचे पान खावे. तुळशीमध्ये पारा असतो, पारावर कोणत्याही प्रकारच्या किरणांचा प्रभाव पडत नाही.

डोळ्यांना हानिकारक बहुतेकांना ग्रहण पाहण्याची उत्सुक्ता असते. पण ते उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. या दरम्यान, सूर्यप्रकाशातील किरणांचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्हाला अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला ग्रहण पाहायचेच असले तर चश्मा घालून पाहा.

गर्भवती महिलेच्या बाळांसाठी धोक्याचे ग्रहण काळात महिलांनी घराबाहेर पडू नये, असेही सांगितले आहे. बाहेरील वातावरणाचा बाळाचा जन्म परीणाम होऊ शकतो. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पण सावधगिरी बाळगणे केव्हाही चांगले.

नकारात्मकतेत वाढ असेही मानले जाते की ग्रहण काळात सूर्याच्या नकारात्मक किरणांचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या काळात मन शांत ठेवा कोणताही निर्णय घेण्या आधी विचार करा.

भारतात ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने इथे त्याचा परिणाम होणार नाही.अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका येथे हे ग्रहण पाहता येईल.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.