AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीत सूर्यग्रहण; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार खूपच अडचणी आणि…

ग्रहणाच्या खगोलीय घटनेला ज्योतिष शास्त्रानुसार देखील विशेष महत्व असतं.

ऐन दिवाळीत सूर्यग्रहण; 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार खूपच अडचणी आणि...
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 23, 2022 | 3:26 PM
Share

नवी दिल्ली : ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. यामुळे खगोलप्रेमी या घडामोडीकडे लक्ष ठेवून असतात. मात्र, ग्रहणाच्या खगोलीय घटनेला ज्योतिष शास्त्रानुसार देखील विशेष महत्व असतं. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीत होणार आहे. 25 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण घडणे ही ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.

ग्रहणच्या आधल्या दिवशीम्हणजेच 24 ऑक्टोबरला दिवाळी सणाचा शुभारंभ होणार आहे. यामुळे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाईल.

अनेक वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग आला आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी दीपावली आणि दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि सणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, ग्रहणाचे शुभ आणि अशुभ प्रभाव अनेक राशींवर पहायला मिळतात.

ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण काही राशींसाठी अडचणी निर्माण करणारे असल्याचे ज्योतीष तज्ञांचे म्हणणे आहे. काही ठराविक राशीच्या लोकांनी ग्रहण काळात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

भारतीय वेळेनुसार, मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:23 पासून सूर्यग्रहण सुरू होणार आहे. सायंकाळी 06:25 पर्यंत हे ग्रहण राहील. ग्रहणाची मध्य वेळ 05:28 वाजता असेल आणि मोक्ष 06:25 वाजता होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे सुतककाळ पाळणे गरजेची नाही.

सूर्यग्रहणामुळे‘या’ राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात

वृषभ – सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकते. या राशीच्या लोकांनी ग्रहण काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. धनहानी होण्याचीही शक्यता आहे. ग्रहण काळात कोणत्याही प्रकारचे व्यवहार आणि गुंतवणूक करणे टाळा.

मिथुन – वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरु शकते. अनावश्यक खर्च टाळावा. अनावश्यक खर्च झाल्यास आर्थिक संकट निर्माण होवू शकते. तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

तूळ – तूळ राशीतील लोक शनीच्या साडेसातीतून जात आहेत. यामुळे हे शेवटचं सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांसाठी नव्या अडचणी निर्माण करणारे ठरू शकते. या ग्रहणाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांच्या मानसिक स्वास्थावर होणार आहे. या काळात मन अस्वस्थ आणि भयभीत राहू शकते. यामुळे अशा वेळेस शांत रहावे.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी देखील सूर्यग्रहण अशुभ मानले जात आहे. आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. उत्पन्नात घट होऊ शकते. आर्थिक संकट टाळण्यासाठी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करु नका.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा