AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahaveer Jayanti 2023 : या तारखेला आहे महावीर जयंती, अशा प्रकारे करा पुजा

जैन धर्माच्या तज्ज्ञांच्या मते भगवान महावीरांचा (Mahaveer jayanti) जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात ईसापूर्व 599 मध्ये झाला होता. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राजेशाही थाट सोडून संसाराचा त्याग केला होता

Mahaveer Jayanti 2023 : या तारखेला आहे महावीर जयंती, अशा प्रकारे करा पुजा
भगवान महावीरImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 01, 2023 | 10:07 PM
Share

मुंबई : जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. जैन धर्माच्या तज्ज्ञांच्या मते भगवान महावीरांचा (Mahaveer jayanti) जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात ईसापूर्व 599 मध्ये झाला होता. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राजेशाही थाट सोडून संसाराचा त्याग केला होता आणि या मार्गावर शेवटपर्यंत चालत त्यांनी माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम केले. जाणून घेऊया या वर्षी महावीर जयंती कधी साजरी होणार, उपासना आणि त्याची मुख्य तत्त्वे?

महावीर जयंती 2023 तारीख

हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 03 एप्रिल रोजी सकाळी 06.24 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 04 मार्च रोजी सकाळी 08.05 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत मंगळवार, 04 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.

महावीर जयंती पूजा कशी केली जाते?

जैन धर्माचे मुख्य तत्व म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि भगवान महावीरांनी सुमारे १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर जैन समाजातील लोक प्रभातफेरी, धार्मिक विधी आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच, या विशेष दिवशी भगवान महावीरांच्या मूर्तीला सोन्याच्या किंवा चांदीच्या कलशातून पाणी अर्पण केले जाते आणि त्यांची शिकवण पूर्ण भक्तिभावाने ऐकली जाते.

भगवान महावीरांची पाच प्रमुख तत्त्वे

भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी पाच मुख्य तत्त्वे दिली होती, ज्यांना पंचशील सिद्धांत असेही म्हणतात. ती तत्त्वे आहेत- सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. दुसरीकडे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. अपरिग्रह म्हणजेच विषय किंवा वस्तूची आसक्ती न राहिल्याने माणूस ऐहिक आकर्षणाचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर अखंड चालतो आणि ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....