AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईपासून दिल्ली हादरली, DGCA ची टीम तात्काळ बारामतीत

Ajit Pawar Death : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता DGCA ची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाल्याचे पहायला मिळाले.

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईपासून दिल्ली हादरली, DGCA ची टीम तात्काळ बारामतीत
Rohit Pawar DGCAImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 11, 2026 | 6:06 PM
Share

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचे निधन झाले होते. त्यानंतर काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच बारामती विमानतळाबाबत आणि विमान कंपनीच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळावरील सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आज DGCA ची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

DGCA अधिकाऱ्यांकडून बारामती विमानतळाची पाहणी

बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षित आहे का, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोहित पवारांनी काय म्हटले होते?

रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “शेवटच्या क्षणी काय घडले हे शोधून काढण्याची गरज आहे. ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला? धावपट्टी 11वर उतरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करण्यात आला? जर विमान धावपट्टी 29वर उतरले असते तर कदाचित इतका मोठा अपघात झाला नसता.”

3000 मीटर दृश्यमानतेवर विमान का उतरवले गेले?

विमानाच्या उतरवण्याच्या वेळी दृश्यमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार यांनी विचारले, “जेव्हा विमान उतरवण्यासाठी डीजीसीएची मार्गदर्शक तत्त्वे 5000 मीटर दृश्यमानता आहे, तेव्हा विमान 3000 मीटर दृश्यमानतेवर का उतरवले गेले? कमी दृश्यमानता जाणूनबुजून योग्य होती का? अपघातात पायलट पाठकची चूक नव्हती का? पायलट कपूरबद्दल आमचे अनेक प्रश्न आहेत आणि आम्हाला उत्तरे हवी आहेत, आणि शक्य तितक्या लवकर.”

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.