AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी पुर्व दिशेला ठेवा ही लहानशी वस्तू, दुर होतील आर्थिक समस्या

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर..

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी पुर्व दिशेला ठेवा ही लहानशी वस्तू, दुर होतील आर्थिक समस्या
सुर्य देवImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 12, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई, यावेळी 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साजरा केला जाणार आहे.  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतात, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. हा सण विशेषतः सूर्यदेवासाठी साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही वास्तु टिप्स अंगीकारल्यास घरातील गरिबी दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते. या शुभ मुहूर्तावर केलेल्या कामामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते. असेही मानले जाते की या दिवशी व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की, जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा त्यांनी काळे तीळ सोबत नेले. ज्याने तो लवकरच खूश झाला.

या कारणास्तव या दिवशी काळ्या तिळाच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या सर्वांपैकी मकर संक्रांतीच्या दिवशी घरी काही विशीष्ट गोष्टी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू आणा

वास्तुशास्त्रात मकर संक्रांतीच्या दिवशी पितळेचा सूर्य घरात आणण्याचे महत्व सांगितले आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. या दिवशी घराच्या पूर्व दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. घराच्या तळाशी पितळी सूर्याची घंटा ठेवल्याने सकारात्मकता दुर होते आणि हे घरामध्ये शुभ चिन्ह मानले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी अशी पूजा करावी

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर या काळात पूजा केल्याने व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात. या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यात लाल फुले आणि अक्षत अर्पण केल्याने सूर्य देव प्रसन्न होतो. तसेच सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. इतकेच नाही तर या दिवशी तीळ, घोंगडी आणि अन्नदान करणे विशेष मानले जाते. दुसरीकडे करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना खिचडी खाऊ घालणे फायदेशीर ठरते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.