AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा करण्यात येते. नवरात्रात कन्या भोजनाला विशेष महत्त्व आहे.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व
कन्या भोजन Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 23, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई,  26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. या काळात संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे निद्रस्त भाग्य जागृत होते, असे म्हटले जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या भोजनाने (Kanya Bhojan) समाप्त होते. या वर्षी नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथी कोणत्या दिवशी येत आहे ते जाणून घेऊया.

अष्टमी

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी लोक अष्टमी तिथीलाच कन्येची पूजा करतात. या वेळी महाअष्टमी सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.47 ते सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 पर्यंत असेल. उदय तिथीमुळे अष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबरलाच ठेवला जाणार आहे.

नवमी

जे लोकं अष्टमी तिथीला कन्येची पूजा करत नाहीत ते नवमीला ही प्रथा पाळतात. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. यावेळी अश्विन शुक्ल नवमी तिथी सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 ते मंगळवार, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.20 पर्यंत असेल. उडीया तिथीमुळे नवमीची पूजा 04 ऑक्टोबरलाच होईल.

कन्या भोजनाचे महत्त्व

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. उपवास करणारे भाविक कन्या भोजनंतरच उपवास सोडतात. कुमारिकांना देवी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी कुमारिकांना अन्नदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्याभोज दरम्यान नऊ कुमारिका असणे आवश्यक आहे. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते,अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....