AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा करण्यात येते. नवरात्रात कन्या भोजनाला विशेष महत्त्व आहे.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व
कन्या भोजन Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 23, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई,  26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. या काळात संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे निद्रस्त भाग्य जागृत होते, असे म्हटले जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या भोजनाने (Kanya Bhojan) समाप्त होते. या वर्षी नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथी कोणत्या दिवशी येत आहे ते जाणून घेऊया.

अष्टमी

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी लोक अष्टमी तिथीलाच कन्येची पूजा करतात. या वेळी महाअष्टमी सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.47 ते सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 पर्यंत असेल. उदय तिथीमुळे अष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबरलाच ठेवला जाणार आहे.

नवमी

जे लोकं अष्टमी तिथीला कन्येची पूजा करत नाहीत ते नवमीला ही प्रथा पाळतात. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. यावेळी अश्विन शुक्ल नवमी तिथी सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 ते मंगळवार, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.20 पर्यंत असेल. उडीया तिथीमुळे नवमीची पूजा 04 ऑक्टोबरलाच होईल.

कन्या भोजनाचे महत्त्व

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. उपवास करणारे भाविक कन्या भोजनंतरच उपवास सोडतात. कुमारिकांना देवी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी कुमारिकांना अन्नदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्याभोज दरम्यान नऊ कुमारिका असणे आवश्यक आहे. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते,अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.