AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून बाहेर पडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरु नका, जाणून घ्या होणारे फायदे

हिंदू धर्मात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. ज्या पाळल्याने जीवनात अनेक फायदे होऊ शकतात. ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना एक छोटी गोष्ट केल्याने आपल्याला जीवनातील ध्येये साध्य करण्यास मदत होऊ शकते आणि दररोज आशीर्वाद व आनंद मिळू शकतो.

घरातून बाहेर पडताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरु नका, जाणून घ्या होणारे फायदे
Home
| Updated on: Mar 20, 2026 | 8:44 AM
Share

नवीन घर घेतल्यानंतर आपण पूजा करते अनेक धार्मिक कार्य करतो. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. पण घरातून कामासाठी किंवा अन्य कोणत्या कामासाठी बाहेर पडताना रोज करायला हव्या अशा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण त्याचं वास्तूशास्त्रात मोठं महत्त्व आहे. व्यक्ती ज्या घरात राहते, ते घर त्याच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. घराच्या प्रकारानुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल आणि प्रभाव घडत असतात. त्यामुळे घराचा कानाकोपरा खूप महत्त्वाचा असतो. असे म्हटले जाते की, महालक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद नेहमी घराच्या उंबरठ्यावर वास करतात. म्हणूनच, ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना एक छोटी गोष्ट केल्यास आपल्याला जीवनातील ध्येये साध्य करण्यास मदत होते आणि दररोज आशीर्वाद व आनंद मिळतो.

त्यामुळे घरातून बाहेर पडताना एक साधी गोष्ट केल्याने तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो… घरातून बाहेर पडताना, आपला उजवा पाय बाहेर ठेवून उंबरठ्याला, म्हणजेच घराच्या देवीला, स्पर्श करावा आणि कृतज्ञता व्यक्त करावी. असे म्हटले जाते की, उंबरठ्यावर नतमस्तक होऊन, “मी निघत आहे, माझी सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होवोत,” अशी प्रार्थना करून निघाल्यास जीवनात शुभ फळे मिळतात. त्याचप्रमाणे, अशाच कृतज्ञतेने घरात प्रवेश करावा.

जेव्हा आपण बाहेरून घरी येतो, तेव्हा सर्वप्रथम उंबरठ्याकडे पाहून, नतमस्तक होऊन प्रार्थना करण्यासाठी आपला उजवा पाय आत ठेवावा. याचे कारण असे की, यामुळे आपण बाहेरून आणलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते; जसे की, त्या दिवशी नकळतपणे केलेली पापे आणि इतर वाईट कृत्ये. हे केवळ आपल्या घरापुरतेच मर्यादित नाही, तर आपण जिथे कुठे राहतो, तिथे बाहेर जाताना असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.