AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात ‘या’ 3 वस्तू चुकूनही रिकाम्या ठेवू नये; अन्यथा आयुष्यभर होईल पश्चात्ताप

वास्तू शास्त्रानुसार घरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही रिकाम्या राहता कामा नये. कारण त्यामुळे घरात अडचणी वाढण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे वास्तूदोषही लागण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत.

घरात 'या' 3 वस्तू चुकूनही रिकाम्या ठेवू नये; अन्यथा आयुष्यभर होईल पश्चात्ताप
Never Leave These 3 Things Empty at Home, Vastu Shastra TipsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2025 | 6:25 PM
Share

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये आपलं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर वास्तूशास्त्रातील नियमांचं पालन केलं तर रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींपासून आपण आपला बचाव करू शकतो. वास्तू शास्त्रानुसार अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण आपण त्या नियमांचे पालन केले तर नक्कीच आपल्याला योग्य ते बदल दिसू लागतात.

वास्तूशास्त्रात, घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीच रिकाम्या ठेवू नयेत यांच्या संबंधातील नियम देखील सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने घरात वास्तूदोष होणार नाही तसेच नकारात्मक प्रभावांपासून दूर राहाल. हे नियम कोणते ते जाणून घेऊयात.

1. पर्स

वास्तूशास्त्रानुसार, पर्स किंवा पाकिट कधीच रिकामं ठेवू नये. कारण रिकाम्या पाकिटाने पैसा येण्याचा मार्गात अडथळा निर्माण होतो. तुम्हाला आर्थिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. पण, जर तुमची पर्स किंवा पाकिट पैशांनी भरलेलं असेल तर हे आर्थिक समृद्धीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे ते कधीच रिकामे ठेवू नयेत. जर तुम्ही ऑनालईनच व्यवहार करत असाल तर पाकिटात किमान 11 रुपये तरी ठेवावेत.

2. बाथरुमची बादली

आपल्या घरातील बाथरुम ही अशी एक जागा आहे जिथे काय पाण्याचा प्रवाह असतो. वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानण्यात आलं आहे. जर तुमच्या बाथरुममधली पाण्याची बादली रिकामी असेल तर त्याच्या आजूबाजूला जल ऊर्जेच्या प्राकृतिक प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती बादली पाण्याने भरलेलीच ठेवण्याचा प्रयत्न करा

3. रिकामी फुलदाणी

तुमच्या घरातील फुलदाणी ही फक्त घराचं वातावरणच प्रसन्न करत नाही तर तुमच्या नात्यांना देखील फुलवण्याचं काम करते. पण, जर तुमच्या घरातील फुलदाणीच रिकामी असेल तर घरात एक प्रकारे एकाकीपणा येतो. वास्तू शास्त्रानुसार, जर तुमची फुलदाणी रिकामी असेल तर ती तुमच्या नातेसंबंधांतील एकाकीपणा, एकलकोंडेपणा निर्देशित करते. त्यामुळेच घरात कधीच रिकामी फुलदाणी ठेवू नका. त्यात शक्यतो खरी फुले ठेवण्याचा प्रयत्न करा पण जर रोज खरी फुले आणणे शक्य नसेल तर किमान खोटी फुले आणून तरी ठेवावं.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.