AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemstone | डिप्रेशन मध्ये आहात? कितीही प्रयत्न केलेत तरी मार्ग निघत नाही? मग मोती करेल तुमची मदत

रत्नशास्त्रामध्ये अनेक रत्नांची (Gemstone) माहिती देण्यात आली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर ही रत्न आपल्याला मदत करतात.

Gemstone | डिप्रेशन मध्ये आहात? कितीही प्रयत्न केलेत तरी मार्ग निघत नाही? मग मोती करेल तुमची मदत
use gem
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 07, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : रत्नशास्त्रामध्ये अनेक रत्नांची (Gemstone) माहिती देण्यात आली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर ही रत्न आपल्याला मदत करतात. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, रत्न माणसाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. याशिवाय शारीरिक (Boy) आणि मानसिक स्थितीचे संतुलन राखण्यासाठीही रत्ने उपयुक्त ठरतात.मोती आणि चंद्राचा खूप जवळचा संबंध ज्योतिष शास्त्रामध्ये आहे. राशीतील चंद्र अथवा शनी कठोर असेल तर मोती हातात परिधान करण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. ज्यांना मानसिक त्रास किंवा चंद्र ग्रह ज्या राशींसाठी चांगला नाही अशा लोकांना मोती धारण करण्यास सांगितलं जातं. चंद्र (Moon) हा मनाचा कारक आहे आणि मोतीचा प्रभावामुळे चंद्र ग्रह बलवान होतो आणि व्यक्तीला नैराश्यापासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे.

मोती कधी परिधान करावा ?

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील चंद्राची महादशा अनुकूल करण्यासाठी मोती धारण केले जातात. यासोबतच कुंडलीत चंद्रासोबत राहू-केतूचा संयोग असला तरीही मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय चंद्र जर पापी ग्रहांच्या दृष्टीत असेल तर अशा स्थितीत मोतीही धारण करतात. जन्मपत्रिकेत चंद्र 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात असतानाही मोती परिधान केले जातात. जेव्हा चंद्र कमजोर असतो किंवा चंद्र-सूर्य संयोग असतो तेव्हा मोती परिधान करतात.

मोती कधी आणि कसा परिधान करावा

ज्योतिषशास्त्रानुसार मोती करंगळीमध्ये परिधान करावा. तसेच तो चांदीच्या अंगठीने धारण करावा. पौर्णिमेच्या दिवशी हे रत्न धारण करणे शुभ मानले जाते. मोती धारण करण्यापूर्वी गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर ते भगवान शंकराला अर्पण करून धारण करावे.

हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम मोत्याबरोबर घालू नका

जर एखाद्या व्यक्तीने मोती घातला असेल तर त्या व्यक्तीने हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम कधीही घालू नये. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्राचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मोती धारण केले जातात, परंतु मोत्यासोबत हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम धारण केल्याने अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात.

मोती परिधान करण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार मोत्याचा रंग पांढरा असतो. उत्तम दर्जाचे मोती दक्षिण समुद्रात मिळतात. काही मोत्यांना पिवळे पट्टे देखील असतात. मोती चंद्राशी संबंधित आहे. अशा स्थितीत सिंह आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा मनावर प्रभाव पडतो. त्यामुळे मन शांत करण्यासाठी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. एवढेच नाही तर मोती धारण केल्याने व्यक्तीला नैराश्यातून मुक्ती मिळू शकते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली