AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | भावनांवर उत्तम नियंत्रण, या पाच राशींच्या व्यक्तींचा EQ असतो लय भारी

भावनिक बुद्धिमत्ता ही स्वतःच्या (Emotionally Very Intelligent) आणि इतरांच्या भावनांना ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची कला आहे.

Zodiac Signs | भावनांवर उत्तम नियंत्रण, या पाच राशींच्या व्यक्तींचा EQ असतो लय भारी
Zodiac-Signs
| Updated on: May 17, 2021 | 10:19 AM
Share

मुंबई : भावनिक बुद्धिमत्ता ही स्वतःच्या (Emotionally Very Intelligent) आणि इतरांच्या भावनांना ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची कला आहे. आसपासच्या वातावरणानुसार आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी उपयोगात आणण्याची क्षमता देखील आहे. काही राशींना त्यांच्या भावनांबद्दल फारशी काळजी नसली तरी, काही राशी अशाही आहेत ज्या भावनिकदृष्ट्या अत्यंत बुद्धिमान असतात, त्यांचं त्यांच्या भावनांवर उत्तम नियंत्रण असतं.  या राशीचे लोक स्वत:च्याच नाही तर इतरांच्याही भावना चांगल्या पद्धतीने समजून घेतात. अशाच 5 राशींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत (People With These Five Zodiac Signs Are Emotionally Very Intelligent And Very Good In Handling Others Emotions) –

मीन राशी

मीन राशीचे लोक साधे लोक असतात, ते त्यांच्या भावना आणि इतरांच्या भावना समजून घेऊ शकतात. ते याला परिपक्व मार्गाने सामोरे जाऊ शकतात. ज्यामुळे इतरांना भावनात्मक संकटांपासून दिलासा मिळतो.

कर्क राशी

कर्क राशीचे लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावनांमध्ये गुतलेलं पाहातात, तेव्हा ते त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि त्या व्यक्तीला समस्येवर मात करण्यास मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. तसेच, कर्क राशीचे लोक आपल्या भावनांसोबत परिपक्व असतात आणि कोणालाही अशा प्रकारे सांभाळू शकतात जसं कोणीही करु शकत नाही.

तूळ राशी

तूळ राशी एक संतुलित राशी आहे, जी कोणत्याही भावनिक अवस्थेत व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक ठिकाणी निष्पक्षताआणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत न्याय हवा असतो, म्हणून जेव्हा एखाद्याला भावनिक वेदना होत असेल तर तूळ राशीच्या लोकांना यामुळे चिंता होत आणि त्यामुळे ते त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रेरित होतात.

कन्या राशी

कन्या राशीचे लोक समर्पित, प्रेरित, कष्टकरी आणि विश्लेषणात्मक लोक असतात. परंतु, ते भावनात्मकदृष्ट्याही चांगले असतात. कन्या राशीचे लोक कुटुंबासाठी जगणारे असतात. जे भावनिक समस्येवेळी आपल्या प्रियजनांना मदत करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात.

वृश्चिक राशी

सर्वात तीव्र राशी, वृश्चिक केवळ स्वत:च्याच भावनांशीच संतुलित नसतात, तर ते इतरांच्या नकळत्या भावनिक समस्या देखील पाहू शकतात. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत दयाळू असतात, ते आपल्या प्रियजनांना भावनिकरित्या 100 टक्के देऊ इच्छितात आणि इतरांकडून देखील तशीच अपेक्षा करतात.

या राशी आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक गोष्टींचे स्पष्ट वर्णन करतात. आज आम्ही या 5 राशींच्या माध्यमातून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की 12 राशींपैकी काही राशी आहेत ज्या भावनिकदृष्ट्या सर्वात बुद्धिमान आहेत.

People With These Five Zodiac Signs Are Emotionally Very Intelligent And Very Good In Handling Others Emotions

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | शनिदेवांना अत्यंत प्रिय असतात, यांच्यावर नेहमी देवाची विशेष कृपा असते

Zodiac Signs | ‘या’ तीन राशीचे लोक मुख्यत: सरकारी नोकरीत उच्च पद भूषवतात, तुमची राशी तर नाही यात?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.