AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गावातून पांडव गेले होते स्वर्गात, गोष्ट त्या गावाची जिथे पंतप्रधान मोदी देणार आहेत भेट

भारताला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतात एक शेवटचे गाव आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.

'या' गावातून पांडव गेले होते स्वर्गात, गोष्ट त्या गावाची जिथे पंतप्रधान मोदी देणार आहेत भेट
भारतातले शेवटचे गाव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 20, 2022 | 11:31 PM
Share

मुंबई, भारतातील शेवटचे गाव कोणते? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर कदाचितच त्याचे उत्तर गुगलवर शोधावे लागेल. त्या गावाचे नाव माना गाव (Mana Village) आहे. हे तेच गाव आहे जिथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Visit) भेट देणार आहेत. या गावाला अधिकृतपणे ‘भारतातील शेवटचे गाव’ (Last Village of India) असा दर्जा आहे. हे गाव उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात येते. या गावापासून चीनची सीमा 24 किलोमीटर अंतरावर आहे. चार धामपैकी एक असलेल्या बद्रीनाथपासून माना गाव जेमतेम 3 किमी अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची 3,219 मीटर आहे. या गावात भोटिया (मंगोल आदिवासी) समाजाचे बहुतांश लोकं राहतात.

माना गाव सरस्वती नदीच्या काठावर आहे. हे गाव हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे. येथील वातावरण अतिशय स्वच्छ आहे. 2019 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात माना गावाला स्वच्छ गावाचा सन्मान मिळाला आहे.

येथून जातो स्वर्गाचा मार्ग

माना गाव हे देशातील शेवटचे गावच नाही तर ते हे गाव आहे जिथून पांडवांनी स्वर्गाचा मार्ग निश्चित केला होता. पौराणिक कथेनुसार पांडव स्वर्गाकडे निघाले असताना त्यांनी हे गाव सोडले होते. पांडव स्वर्गात जात असताना द्रौपदीही त्यांच्यासोबत होती. पांडवांना सशरीर स्वर्गात जायचे होते. या प्रवासात पांडवांसोबत एक कुत्राही होता.

य प्रवासात वाटेत एक एक करून सर्वजण पडू लागले. आधी द्रौपदी पडली आणि मरण पावली. मग सहदेव, नकुल, अर्जुन आणि भीम हेही पडले. शेवटपर्यंत फक्त युधिष्ठिरच जिवंत राहिला. केवळ तोच सशरीर स्वर्गात पोहोचू शकला अशी आख्यायिका आहे. युधिष्ठिराच्या बरोबर असलेला कुत्रा यमराज होते असे म्हणतात.

येथे बांधला आहे भीम पुल

याच गावात ‘भीम पुल’ही बांधण्यात आला आहे. हा पूल भीमाने बांधला असे मानले जाते. हा पूल एक मोठा दगड आहे, जो सरस्वती नदीवर आहे. भीम पुल हे माना गावातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.

पौराणिक कथेनुसार माना गावातून पांडव स्वर्गात जात असताना द्रौपदीला सरस्वती नदी पार करणे कठीण जात होते. त्यामुळे अशा स्थितीत भीमाने एक मोठा दगड उचलून येथे ठेवला.

हा संपूर्ण एक मोठा दगड आहे. हा दगड अशा प्रकारे ठेवण्यात आला आहे की तो पूल झाला आहे. यानंतर द्रौपदीने पुलावरून नदी पार केली.

अशीही एक आख्यायिका आहे की भीम पुल हे तेच ठिकाण आहे जिथे वेदव्यासांनी गणपतीला महाभारत लिहायला लिहायला सांगितले होते.

आणखी काय आहे विशेष?

2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या  1214 आहे. हिवाळ्याच्या दिवसांत, लोक सखल भागात येतात, कारण या काळात संपूर्ण परिसर बर्फाने झाकलेला असतो.

या गावात एक तप्त कुंड आहे. जे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तप्त कुंड हे अग्निदेवाचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असून येथे स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, अशी मान्यता आहे.

याशिवाय गणेश गुफा, व्यास गुफा, भीम पुल, सरस्वती मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत. बद्रीनाथपासून 9 किमी अंतरावर वसुधारा धबधबाही आहे. पांडवांनीही येथे काही काळ मुक्काम केल्याचे मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.