AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Navami 2023 : प्रभू श्री रामांचे हे पाच गुण जो अंगिकारतो त्याचा भाग्योदय नक्की होतो

भगवान राम हे जगात एक असे आदर्श आहेत, ज्यांनी मानव म्हणून जन्म घेऊन कधीही आपल्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले नाही आणि त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.

Ram Navami 2023 : प्रभू श्री रामांचे हे पाच गुण जो अंगिकारतो त्याचा भाग्योदय नक्की होतो
राम नवमीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 28, 2023 | 2:55 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात राम नामाला सर्वात मोठा तारक मंत्र मानला गेला आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणार्‍या भगवान श्री रामाची पूजा (Ram Navami 2023) केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद लाभतात. भगवान राम हे जगात एक असे आदर्श आहेत, ज्यांनी मानव म्हणून जन्म घेऊन कधीही आपल्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले नाही आणि त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. आसुरी शक्तींशी लढतानाही त्यांनी सत्य आणि धर्माची बाजू कधी सोडली नाही. चला रामाच्या त्या गुणांबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ज्याचा अवलंब केल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित मानले जाते.

1. सूर्योदयापूर्वी उठणे

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान राम हे  दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्यदेवाची पूजा करत असत. जर तुम्ही प्रभू रामाचा हा गुण तुमच्या जीवनात आत्मसात केला तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या नक्कीच दूर होतील. सकाळच्या वेळी वातावरणात अधीक सकारात्मकता असते. या वेळी  ध्येय साध्य करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी विचारमंथन करा. आरोग्यासाठी वेळ द्या

2. व्यवस्थापनाने प्रत्येक अशक्य काम केले

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान राम व्यवस्थापन कलेमध्ये निपुण होते. आपल्या संसाधनांचा आणि लोकांचा चांगला वापर कसा करायचा हे त्यांना माहीत होते. प्रभू राम इतरांच्या गुणांचे परीक्षण करून सर्वोत्तम उत्पादन मिळवत असत. हनुमानजींना लंकेला पाठवणे असो, संजीवनी वनौषधी आणने असो किंवा समुद्र ओलांडण्यासाठी रामसेतू  बनवण्याची जबाबदारी असो. या सर्व कामांमध्ये श्री रामांचे व्यवस्थापण वाखाण्याजोगे होते.

3. सर्वांप्रती समान भावना

भगवान राम अत्यंत नम्र होते आणि सर्वांशी समान समान आणि आदरपुर्वक वागणूक ठेवत. प्रत्येक लहान मोठ्या माणसाला ते भावनेच्या स्थरावर जोडले जात असे.  महाबली हनुमान यांच्याशी भावनिक स्थरावर ते अधीक जुळलेले होते. अयोध्येचा राजा असूनही त्यांना त्याचा गर्व नव्हता. त्यांनी शबरीची उष्टी बोरही प्रेमाने खाल्ली. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना समाजातील सर्व स्तरातून प्रेम आणि पाठिंबा मिळाला.

4.  नातेसंबंधांचे मूल्य

आपल्या जीवनातील सर्व नातेसंबंधांचा आदर करत, प्रभू रामांनी असे उदाहरण मांडले, ते पाहून आज जगभरातील लोकांना आपल्या घरात आपल्यासारखा मुलगा, भाऊ, मित्र आणि गुरु हवा आहे. प्रभू रामाने त्यांच्या प्रत्येक नात्याला आदर दिला कोणाच्याच भावनांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी क्षणार्धात संपूर्ण राजपाट सोडला. सुग्रीव आणि निषादराज केवत यांच्या मैत्रीचे एक उत्तम उदाहरण सादर केले आणि तेथे त्यांना हनुमानजींचे खरे गुरु म्हटले गेले.

5. स्वतः एक उत्तम उदाहरण व्हा

जगाचे रक्षणकर्ते, भगवान विष्णूचे अवतार असूनही आणि सर्व महान शक्ती धारण करूनही, भगवान राम नेहमी सामान्य माणसाचे जीवन जगले. जीवनाशी निगडीत सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी, त्यांनी एका सामान्य माणसाप्रमाणे मर्यादित मार्गांनी अमर्याद ध्येये निश्चित करून दाखवली. सामान्य माणसाप्रमाणे जीवनाच्या त्या खडतर वाटेवर चालताना दाखवून दिले ज्यावर लोकांना अनेकदा अडचणी येतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?