AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravidas Jayanti 2022 | माणसाचे कर्मच माणसाची ओळख सांगतात, हे सांगणारे गुरु रोहिदास यांची जयंती!

या वर्षी गुरु रविदास यांची जयंती बुधवार, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी केली जाईल. संत गुरु रविदास यांची ही ६४५ वी जयंती आहे .

Ravidas Jayanti 2022 | माणसाचे कर्मच माणसाची ओळख सांगतात, हे सांगणारे गुरु रोहिदास यांची जयंती!
Ravidas-Jayanti-2022
| Updated on: Feb 15, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई : संत गुरु रविदास (Ravidas Jayanti 2022) यांची ही ६४५ वी जयंती आहे . गुरु रविदास यांना रैदास आणि रोहिदास म्हणूनही ओळखले जातात.  ते भक्ती चळवळीचे प्रसिद्ध संत होते. या वर्षी गुरु रविदास यांची जयंती बुधवार, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी केली जाईल. संत गुरु रविदास यांची ही ६४५ वी जयंती आहे . गुरु रविदास, ज्यांना रैदास आणि रोहिदास (Ravidas) म्हणूनही ओळखले जातात.  चळवळीवर त्यांनी रचलेल्या भक्तिगीते आणि श्लोकांनी भक्तीचा नेहमीच प्रभाव पडलेला पाहायला मिळाला आहे. इतिहासकारांच्या मते, गुरु रविदास यांचा जन्म इसवी सन 1398 मध्ये झाला. त्याच वेळी, काही तज्ञ म्हणतात की त्यांचा जन्म 1450 मध्ये झाला होता. इतिहासकारांच्या मते, गुरु रविदासांचा जन्म उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसीच्या सीर गोवर्धनपूर गावात झाला. गुरु रविदासांचा जन्म माघ पौर्णिमेला झाला असे अनेकांचे मत आहे. म्हणून हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार गुरु रविदास जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.

रविदास जयंती 2022 तारीख रविदास जयंती 2022 तारीख – 16 फेब्रुवारी 2022, बुधवार, पौर्णिमा तिथीची सुरुवात – 15 फेब्रुवारी 2022 रोजी 09:16 ते पौर्णिमा तारखेच्या समाप्तीपर्यंत – 16 फेब्रुवारी 2022 रात्री 01:25 पर्यंत

रविदास जींचे श्लोक

रविदास म्हणतात जन्म के कारनै, होत न कोउ नीच। नर कूँ नीच करि डारि है, ओछे करम की कीच।

अर्थ – रविदासजी म्हणतात की, माणूस केवळ जन्माने नीच होत नाही, तर केवळ त्याची कृती माणसाला खरी ओळख देते.

“कृस्न, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा। वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा।।”

अर्थ – राम, कृष्ण, हरी, ईश्वर, करीम, राघव ही एकाच देवाची वेगवेगळी नावे आहेत. वेद, कुराण, पुराण इत्यादी सर्व धर्मग्रंथांमध्ये एका भगवंताची स्तुती करण्यात आली आहे आणि सर्वच देव भक्तीसाठी सद्गुणाचा धडा शिकवतात.

“मन चंगा तो कठौती में गंगा”

अर्थ – जर तुमचे मन शुद्ध असेल तर देव तुमच्या हृदयात वास करतो.

हरि-सा हीरा छांड कै, करै आन की आस। ते नर जमपुर जाहिंगे, सत भाषै रविदास।।

अर्थ – भगवंताच्या भक्तीशिवाय इकडे तिकडे भटकणे निरर्थक आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

08 February 2022 Panchang | 8 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.