AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | मोठ्या संकटांपासून वाचवू शकतात आचार्य चाणक्य यांचे हे 4 मंत्र

छोट्या- छोट्या चुका एके दिवशी मोठ्या समस्यांचे कारण बनतात, म्हणून कोणीही कोणतेही काम इतके परिश्रमपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की चुकांना जागाच राहणार नाही. एकदा चूक झाली तरी ती पुन्हा पुन्हा होऊ नये. जेव्हा एखादी चूक पुन्हा पुन्हा पुन्हा घडते तेव्हा ती एक दिवस मोठी समस्या बनते.

Chanakya Niti  | मोठ्या संकटांपासून वाचवू शकतात आचार्य चाणक्य यांचे हे 4 मंत्र
CHANAKYA-NITI
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 7:38 AM
Share

मुंबई : छोट्या- छोट्या चुका एके दिवशी मोठ्या समस्यांचे कारण बनतात, म्हणून कोणीही कोणतेही काम इतके परिश्रमपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की चुकांना जागाच राहणार नाही. एकदा चूक झाली तरी ती पुन्हा पुन्हा होऊ नये. जेव्हा एखादी चूक पुन्हा पुन्हा पुन्हा घडते तेव्हा ती एक दिवस मोठी समस्या बनते.

जर ती व्यक्ती येणाऱ्या परिस्थितीचे आकलन करु शकते, तर ती व्यक्ती सहजपणे त्यास सामोरे जाण्यासाठी धोरण तयार करु शकते. आचार्य चाणक्य यांचाही असाच विश्वास होता. आचार्य चाणक्य स्वत: सुद्धा खूप दूरदर्शी होते. ते परिस्थितीचा अंदाज घेत असे आणि त्यानुसार आपली रणनीति तयार करत असे. त्यांच्या दूरदृष्टी आणि बुद्धिमत्तेचा परिणाम होता की त्याने एका सामान्य मुलालाही सम्राट बनवले. आचार्यांनी त्यांचे अनुभव त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात लिहिले आहेत. चाणक्य नीतिच्या त्या गोष्टी जाणून घ्या ज्या तुम्हाला मोठ्या संकटांपासून वाचवू शकतात.

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत् सत्यपूतं वदेद्वाचं मनः पूतं समाचरेत्…

1. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की चालताना नजर खाली ठेवा कारण थोडीशी चूक झाल्यास व्यक्तीला दुखापत होऊ शकते. चालताना जर तुम्ही सतर्क नसाल, तर तुम्ही स्वतःच संकटांना आमंत्रण द्याल.

2. संकट टाळण्याचा दुसरा मार्ग म्हणजे स्वतःला निरोगी ठेवणे. जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर आजार तुम्हाला घेरतात. स्वच्छता केवळ शरीराचीच नव्हे तर अन्नाचीही असावी. पाणी नेहमी कपड्याने गाळून घेतल्यानंतर प्यावे. आचार्यांची ही गोष्ट आजही कामाची आहे. आज लोक कपड्यांऐवजी प्युरिफायर वापरतात.

3. कोणतेही काम मनापासून करा, म्हणजे काम करताना प्रत्येक प्रकारे विचार करा, समजून घ्या आणि निष्कर्षापर्यंत पोहोचा. अशा प्रकारे, आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून निर्णय घ्या. ज्या गोष्टी विचार न करता केल्या जातात त्या अडचणीत येतात.

4. अडचणीत येण्याचे एक मोठे कारण खोटे आहे. एक खोटे लपवण्यासाठी, अनेक खोटी बोलावी लागतात. अशा परिस्थितीत एक दिवस त्यांचे खोटे नक्कीच पकडले जाते. यामुळे, एखादी व्यक्ती आपला विश्वास, सन्मान आणि आदर गमावते, तसेच कधीकधी यामुळे इतर अडचणी देखील वाढू शकतात. म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा कधीही आधार घेऊ नका.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर तुम्हाला सन्मान प्रिय असेल तर आजच या 3 सवयी सोडा

Chanakya Niti : या 3 गोष्टींमध्ये संयम बाळगणे अति आवश्यक असते, अन्यथा मोठं नुकसान भोगावं लागू शकते…

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.