AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rudraksha Benefits : रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत अनेक फायदे, या गोष्टींची घ्यावी लागते काळजी

रुद्राक्ष शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. हे तणाव, चिंता आणि इतर नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते. हे ध्यानासाठी देखील वापरले जाते, जे लक्ष केंद्रित करण्यात मदत करते.

Rudraksha Benefits : रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत अनेक फायदे, या गोष्टींची घ्यावी लागते काळजी
रूद्राक्षImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 03, 2023 | 8:32 AM
Share

मुंबई : रुद्राक्ष हिंदू धर्मात पवित्र मानला जातो आणि तो भगवान शिवाशी संबंधित असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते. याचा अर्थ ‘रुद्राचा डोळा’ असा आहे, भगवान शिवाच्या डोळ्यांतून वाहलेल्या अश्रूंमधून त्याची उतपत्ती झाली अशी धार्मिक मान्यता आहे. रुद्राक्षाचे (Rudraksha Benefits) विविध प्रकार  असल्यामुळे त्याचे महत्त्व आणि उपयोग बदलतो. हे धार्मिक आणि आध्यात्मिक हेतूंसाठी जपमाळाच्या स्वरूपात परिधान केले जाते. भारत आणि नेपाळमध्ये रुद्राक्षाची विशेष पूजा आणि महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद येतो.

रुद्राक्ष धारण केल्याने फायदा होतो

रुद्राक्ष शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. हे तणाव, चिंता आणि इतर नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते. हे ध्यानासाठी देखील वापरले जाते, जे लक्ष केंद्रित करण्यात मदत करते. असे मानले जाते की जो व्यक्ती ते धारण करतो त्याला अकाली मृत्यूची भीती नसते. परंतु, रुद्राक्ष धारण करताना काही नियम आणि विधींचे पालन करणे फार महत्वाचे आहे.

रुद्राक्ष धारण करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • ज्याप्रमाणे सोमवारी उपवास, पूजा आणि रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, त्याचप्रमाणे रुद्राक्ष धारण केल्यानेही भगवान प्रसन्न होतात.
  • ज्योतिष शास्त्रानुसार, रुद्राक्ष धारण करण्याचा सर्वात शुभ दिवस सोमवार मानला जातो कारण तो भगवान शिवाचा दिवस आहे.
  • जेव्हा तुम्ही रुद्राक्षाची माळ घालणार असाल तेव्हा त्यात किमान 27 मणी असावेत याची नोंद घ्यावी. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी काही पूजा विधी पाळणे आवश्यक आहे.
  • जपमाळ प्रथम लाल कपड्यात बांधून शिवमंदिरात ठेवावी आणि ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. नामजप केल्यावर जपमाळ व हात गंगाजलाने धुवावेत व शिवभक्तीमध्ये रुद्राक्षाची जपमाळ धारण करावी अशी प्रतिज्ञा घ्यावी.
  • रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी आंघोळ करावी, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धता राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.