AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवती अमावस्येला ‘या’ ठिकाणी लावा दिवे, लक्ष्मी देवीची सदैव राहील कृपा

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. या दिवशी पितरांचे स्नान आणि श्राद्ध ही केले जाते. असे मानले जाते की या दिवशी काही खास ठिकाणी दिवे लावल्याने लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्त होते.

सोमवती अमावस्येला 'या' ठिकाणी लावा दिवे, लक्ष्मी देवीची सदैव राहील कृपा
सोमवती अमावस्या
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 4:25 PM
Share

हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्त्व दिले जाते. या वर्षाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या येते असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी उपवास, पूजा आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दानाबरोबरच पितृपूजाही केली जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. याशिवाय ग्रहदोष आणि पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते. याशिवाय सोमवती अमावस्येला काही खास ठिकाणी दिवे लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात तसेच लक्ष्मी देवी नेहमी तुमच्या प्रसन्न राहते.

सोमवती अमावस्या कधी आहे?

वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तिथी सोमवार, ३० डिसेंबर रोजी आहे. त्या दिवशी पौष अमावस्या असेल. तिसरी सोमवती अमावस्या 30 डिसेंबर रोजी पहाटे 04 वाजून 01 मिनिटांपासून 31 डिसेंबर रोजी पहाटे 03 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे.

सोमवती अमावस्याला या ठिकाणी लावा दिवे

सोमवती अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध केले जाते. अशा वेळी घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कारण ती पितरांची दिशा मानली जाते, तर असे केल्याने पितरसुखी होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतात.

पिंपळाचे झाड

अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावर देवी-देवतांसोबत पूर्वजांचाही वास असतो. त्यामुळे सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाजवळ मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ मिळते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर

तसे तर लोक रोज घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावतात. परंतु सोमवती अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय व्यक्तीला आर्थिक अडचणींपासूनही मुक्ती मिळते.

घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावा

धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात, तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो, यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. म्हणून आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.