AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय असणार ग्रहणाची वेळ अन् 12 राशींवर परिणाम होणार का?

7 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले. तर आता 21 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. काय असणार ग्रहणाची वेळ अन् सुतक काळ तसेच 12 राशींवर या सूर्यग्रहणाचा परिणाम होणार का? यासंबंधित माहिती जाणून घेऊयात.

21 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय असणार ग्रहणाची वेळ अन् 12 राशींवर परिणाम होणार का?
The last solar eclipse of 2025; Will the solar eclipse be visible in IndiaImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 10, 2025 | 4:21 PM
Share

सप्टेंबर महिना खूप खास मानला जात आहे. कारण एकीकडे हा महिना पितृपक्षापासून शारदीय नवरात्रीपर्यंत आहे, तर दुसरीकडे चंद्रग्रहणाव्यतिरिक्त या महिन्यात सूर्यग्रहणही होत आहे. अलिकडेच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले आहे. . भारतात हे चंद्रग्रहण दिसले, ज्यामुळे पुढील 6 महिन्यांसाठी 12 राशींच्या जीवनात निश्चितच काही प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो. त्याच वेळी, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील या महिन्याच्या शेवटी होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होणार आहे? ते भारतात दिसणार आहा का? तसेच त्याचा सुतक काळ काय असेल हे जाणून घेऊयात.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होईल?

पंचांगानुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला म्हणजेच रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल. हा दिवस सर्व पितृ अमावस्या देखील आहे. यासोबतच, दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहेत.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण किती वाजता होईल?

21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण रात्री 11 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत चालेल.

भारतात सूर्यग्रहण दिसणार आहे का?

सप्टेंबर महिन्यातील दुसरे ग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. तसेच, ते रात्रीच्या वेळी होत असल्याने, ते भारतात दिसणार नाही.

सूर्यग्रहण कुठे दिसेल?

जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी ते दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलानेशिया, नॉरफोक बेट, आयलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये दिसेल.

सूर्यग्रहणाचा सुतक काळ काय असेल?

जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सुतक काळ त्याच्या 12 तास आधी सुरू होतो, जो ग्रहणानंतर संपतो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई असते. तसेच मंदिरांचे दरवाजे देखील बंद ठेवण्यास सांगितले जातात. याशिवाय गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पण हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाही.

सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कोणत्या राशीत असेल?

सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल. अशा परिस्थितीत, 12 राशींच्या जीवनावर त्याचा काहीना काही परिणाम दिसून येऊ शकतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...