AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj: सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान, जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?

प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत, ते आपल्या भक्तांना सरळ, सोप्या आणि साध्या भाषेत प्रवचनांच्या माध्यमातून उपदेश करत असात, त्यांच प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भक्त गर्दी करतात. दरम्यान एका प्रवचनामध्ये आपल्या भक्तांशी संवाद साधताना प्रेमानंद महाराज यांनी सकाळी झोपेतून उशिरा उठण्याचे काही तोटे सांगितले आहेत.

Premanand Maharaj: सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान, जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
प्रेमानंद महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 8:18 PM
Share

सकाळची वेळ ही खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते. हिंदू धर्मातील अनेक शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये म्हटलं आहे, तसेच साधू , सतांनी देखील सांगितलं आहे की व्यक्तीने नेहमी सूर्योदयापूर्वीच झोपेतून उठलं पाहिजे. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतो किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठतो आणि सूर्यदेवाला नमस्कार करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही, असा व्यक्ती नेहमी आरोग्यदायी राहतो, त्याला कुठलाही आजार होत नाही, तसेच त्याच्या घरात कधीची धनाची कमतरता जाणवत नाही. दररोज सकाळी लवकर झोपेतून उठण्याचे फायदे सांगताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, दररोज सकाळी झोपेतून लवकर उठून सूर्यदेवाची पूजा केल्यानं व्यक्तीला केवळ अध्यात्मिक फायदाच मिळत नाही तर ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायद्याचं ठरतं. कारण जो माणूस सकाळी लवकर उठतो, तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्या आयुष्यभर फिट राहतो.

प्रेमानंद महाराज म्हणतात ज्या लोकांना झोपेतून उशिरा उठण्याची सवय आहे, त्या लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज हळुहळु कमी होण्यास सुरुवात होते. कारण तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून लवकर उठता, तेव्हा संपूर्ण वातावरण हे सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं. सूर्याची कोवळी किरणं, थंडी हवा आणि अध्यात्मिक वातावरण याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो, परिणामी जे लोक दररोज सकाळी लवकर उठतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते.

दुसरा तोटा सांगताना प्रेमानंद महाराज म्हणतात की जे लोक झोपेतून सकाळी उशिरा उठतात त्याच्या चेहऱ्यावरील ताजेपणा हळुहळु कमी होतो, असे लोक आळशी होतात, मग त्यांना कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे माणसानं नेहमी सकाळी लवकर झोपेतून उठलं पाहिजे.

आळस – प्रेमानंद महाराज म्हणतात जे सकाळी उशिरा उठतात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे असे लोक आळशी असतात, उशिरा उठल्यामुळे त्यांच्या अंगात आळस कायम राहतो, अशा लोकांना कोणतंही काम लवकर करण्याची इच्छा होत नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.