Chanakya Niti | या तीन सवयी तरुणांसाठी अत्यंत धोकादायक, वेळीच बदला अन्यथा आयुष्य उध्वस्त होईल

तारुण्य हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये, व्यक्तीकडे सर्व काही आहे, शक्ती, सामर्थ्य, धैर्य आणि उत्कटता. म्हणून एखाद्या व्यक्तीने तारुण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रति गंभीर असले पाहिजे. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की जर तुम्हाला तुमच्या तारुण्याचे महत्त्व समजले नाही तर आयुष्यात दु:ख वगळता काहीच उरणार नाही. माणूस तारुण्यात जे काही कमावतो, तो म्हातारपणात त्याचा आधार बनतो.

Chanakya Niti | या तीन सवयी तरुणांसाठी अत्यंत धोकादायक, वेळीच बदला अन्यथा आयुष्य उध्वस्त होईल
आचार्य आपल्या धोरणात म्हणतात की ज्या व्यक्तीचे ज्ञान पुस्तकांमध्ये बंदिस्त आहे आणि ज्याने आपली संपत्ती इतरांच्या हाती सोपवली आहे, तो गरज असतानाही कोणत्याही ज्ञानाचा किंवा संपत्तीचा वापर करू शकत नाही.
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 7:15 AM

मुंबई : तारुण्य हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये, व्यक्तीकडे सर्व काही आहे, शक्ती, सामर्थ्य, धैर्य आणि उत्कटता. म्हणून एखाद्या व्यक्तीने तारुण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रति गंभीर असले पाहिजे. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की जर तुम्हाला तुमच्या तारुण्याचे महत्त्व समजले नाही तर आयुष्यात दु:ख वगळता काहीच उरणार नाही. माणूस तारुण्यात जे काही कमावतो, तो म्हातारपणात त्याचा आधार बनतो.

म्हणून, तारुण्यादरम्यान, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या भविष्याबद्दल जागरुक असले पाहिजे आणि योग्य रणनिती बनवून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. पण काही सवयी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा तीन सवयींबद्दल सांगितले आहे. जर एखाद्या व्यक्तीने वेळीच या सवयी दूर केल्या तर तो आपले भविष्य उज्ज्वल करु शकतो.

आळस

आळस हा केवळ तरुणांचाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा शत्रू आहे. याने फक्त आपला वेळ वाया जातो. चाणक्यांचा असा विश्वास होता की, तरुणांच्या जीवनात आळसाला स्थान नसावे. युवकांनी नेहमी शिस्तीने जीवन जगावे आणि त्यांची झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ निश्चित केली पाहिजे. जेणेकरुन आळसाने त्यांच्यावर वर्चस्व गाजवू नये आणि ते त्यांच्या मौल्यवान वेळेचा चांगला वापर करु शकतील.

अंमली पदार्थांचे व्यसन

अंमली पदार्थांचे व्यसन हा तरुणांसाठी एक शाप आहे. नशा केल्याने केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुबळा होतो. व्यसन व्यक्तीला चुकीच्या संगतीत घेऊन जाते. प्रत्येक प्रकारे सक्षम असूनही, अशी व्यक्ती आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास सक्षम नसते. अशी व्यक्ती केवळ त्याचे वर्तमानच खराब करत नाही तर भविष्य देखील खराब करते.

चुकीची संगत

चाणक्य निती सांगते की संगतीचा प्रभाव व्यक्तीवर नक्की पडतो. जर एखादी व्यक्ती चुकीच्या लोकांमध्ये बसली तर त्यांच्यामध्ये वाईट सवयी नक्कीच येतील. म्हणून, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या संगतीबद्दल जागरुक असले पाहिजे. चुकीचे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात आणि तुमचे आयुष्य अंधकारमय दिशेने घेऊन जातात. म्हणून नेहमी योग्य संगतीमध्ये राहा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Chanakya Niti : शत्रुवर मात करायची असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 3 सल्ले लक्षात ठेवा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.