AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या तीन सवयी तरुणांसाठी अत्यंत धोकादायक, वेळीच बदला अन्यथा आयुष्य उध्वस्त होईल

तारुण्य हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये, व्यक्तीकडे सर्व काही आहे, शक्ती, सामर्थ्य, धैर्य आणि उत्कटता. म्हणून एखाद्या व्यक्तीने तारुण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रति गंभीर असले पाहिजे. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की जर तुम्हाला तुमच्या तारुण्याचे महत्त्व समजले नाही तर आयुष्यात दु:ख वगळता काहीच उरणार नाही. माणूस तारुण्यात जे काही कमावतो, तो म्हातारपणात त्याचा आधार बनतो.

Chanakya Niti | या तीन सवयी तरुणांसाठी अत्यंत धोकादायक, वेळीच बदला अन्यथा आयुष्य उध्वस्त होईल
आचार्य आपल्या धोरणात म्हणतात की ज्या व्यक्तीचे ज्ञान पुस्तकांमध्ये बंदिस्त आहे आणि ज्याने आपली संपत्ती इतरांच्या हाती सोपवली आहे, तो गरज असतानाही कोणत्याही ज्ञानाचा किंवा संपत्तीचा वापर करू शकत नाही.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 13, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : तारुण्य हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये, व्यक्तीकडे सर्व काही आहे, शक्ती, सामर्थ्य, धैर्य आणि उत्कटता. म्हणून एखाद्या व्यक्तीने तारुण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रति गंभीर असले पाहिजे. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की जर तुम्हाला तुमच्या तारुण्याचे महत्त्व समजले नाही तर आयुष्यात दु:ख वगळता काहीच उरणार नाही. माणूस तारुण्यात जे काही कमावतो, तो म्हातारपणात त्याचा आधार बनतो.

म्हणून, तारुण्यादरम्यान, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या भविष्याबद्दल जागरुक असले पाहिजे आणि योग्य रणनिती बनवून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. पण काही सवयी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा तीन सवयींबद्दल सांगितले आहे. जर एखाद्या व्यक्तीने वेळीच या सवयी दूर केल्या तर तो आपले भविष्य उज्ज्वल करु शकतो.

आळस

आळस हा केवळ तरुणांचाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा शत्रू आहे. याने फक्त आपला वेळ वाया जातो. चाणक्यांचा असा विश्वास होता की, तरुणांच्या जीवनात आळसाला स्थान नसावे. युवकांनी नेहमी शिस्तीने जीवन जगावे आणि त्यांची झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ निश्चित केली पाहिजे. जेणेकरुन आळसाने त्यांच्यावर वर्चस्व गाजवू नये आणि ते त्यांच्या मौल्यवान वेळेचा चांगला वापर करु शकतील.

अंमली पदार्थांचे व्यसन

अंमली पदार्थांचे व्यसन हा तरुणांसाठी एक शाप आहे. नशा केल्याने केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुबळा होतो. व्यसन व्यक्तीला चुकीच्या संगतीत घेऊन जाते. प्रत्येक प्रकारे सक्षम असूनही, अशी व्यक्ती आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास सक्षम नसते. अशी व्यक्ती केवळ त्याचे वर्तमानच खराब करत नाही तर भविष्य देखील खराब करते.

चुकीची संगत

चाणक्य निती सांगते की संगतीचा प्रभाव व्यक्तीवर नक्की पडतो. जर एखादी व्यक्ती चुकीच्या लोकांमध्ये बसली तर त्यांच्यामध्ये वाईट सवयी नक्कीच येतील. म्हणून, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या संगतीबद्दल जागरुक असले पाहिजे. चुकीचे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात आणि तुमचे आयुष्य अंधकारमय दिशेने घेऊन जातात. म्हणून नेहमी योग्य संगतीमध्ये राहा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Chanakya Niti : शत्रुवर मात करायची असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 3 सल्ले लक्षात ठेवा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली