AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची इच्छा आहे. यासाठी ते स्वत:कडून पूरेपूर प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. आचार्य चाणक्य यांनीही अपयशाबाबत आपली मते मांडली आहेत.

Chanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya Chanakya
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 7:55 AM
Share

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची इच्छा आहे (Chanakya niti). यासाठी ते स्वत:कडून पूरेपूर प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. आचार्य चाणक्य यांनीही अपयशाबाबत आपली मते मांडली आहेत. आचार्य यांचे बोल कठोर वाटतात, परंतु ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी आणि सुलभ करण्यासाठी असतात. आचार्य यांच्या विचारांचे पालन केल्याने सर्वात कठीण परिस्थितीतसुद्धा आपण सहज मार्ग काढू शकतो (These Two Types Of People Never Get Success In Life Know Reason According To Acharya Chanakya).

‘दोन प्रकारचे व्यक्ती जीवनात अपयशी ठरतात. एक म्हणजे ते जे विचार करतात पण काहीही करत नाहीत आणि दुसरे ते जे गोष्टी करतात पण विचार करत नाहीत’ – आचार्य चाणक्य

आचार्य यांचा यांच्या मते, जीवनात अनेक प्रकारचे व्यक्ती असतात. काही लोक असे असतात जे काहीही विचार न करता, योग्य रणनीति न आखता परिश्रम करतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यात वारंवार अपयश येत. कारण, परिश्रम जर योग्य दिशेने केले नाहीत तर ते व्यर्थ ठरतात. उधळीही रात्रंदिवस कठोर परिश्रम करते, परंतु ते कधी निर्माण नाही तर विनाश करतात. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपले ध्येय ठरवा. त्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठी योजना तयार करा आणि त्याच्या परिणामाचाही विचार करा. दरम्यानच्या काळात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहा. मग सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. दिशाहीन माणूस कधीही यश मिळवू शकत नाही.

दुसरीकडे, काही व्यक्ती असे असतात जे मनात मोठी स्वप्ने पाहातात. पण, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही काम करत नाही. अशा व्यक्तींच्या मनात दररोज काही नवीन कल्पना येतात आणि ते त्यात मग्न होतात. मग ते सोडून दुसरे कुठले स्वप्न पाहातात. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो माणूस केवळ विचार करत राहतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. वास्तविक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

These Two Types Of People Never Get Success In Life Know Reason According To Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.