Chanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका

र्‍याच वेळा लोक नकळत अशा चुका करतात ज्यासाठी (Acharya Chanakya ) त्यांना नंतर मोठं नुकसान सहन करावे लागते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवनात अशी चूक टाळण्यासाठी आपल्याला चाणक्य नीति वाचण्याची गरज आहे.

Chanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 7:21 AM

मुंबई : बर्‍याच वेळा लोक नकळत अशा चुका करतात ज्यासाठी (Acharya Chanakya ) त्यांना नंतर मोठं नुकसान सहन करावे लागते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवनात अशी चूक टाळण्यासाठी आपल्याला चाणक्य नीति वाचण्याची गरज आहे. आचार्य चाणक्य केवळ कुशल रणनीतिकार, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ नव्हते तर ते जवळजवळ प्रत्येक विषयाचे जाणकार होते. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप कठीण काळ पाहिला आणि त्या परिस्थितींचा बारकाईने अभ्यास केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही ते दररोज आपला कौशल्य सुधारत राहिले (Acharya Chanakya Said Never Share These Four Things To Anyone Who Close To You In Chanakya niti).

आचार्य यांचा असा विश्वास होता की प्रत्येकाने प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकले पाहिजे. आपल्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या मदतीने ते आयुष्यभर लोकांना मदत करत राहिले. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति नावाचा एक ग्रंथ लिहिला ज्यामध्ये अशी अनेक धोरणे सांगण्यात आली आहेत जी एखाद्या व्यक्तीला वाईट काळापासून वाचविण्यात मदत करतात. आचार्य यांच्या धोरणांचे अनुसरण करुन एखादी व्यक्ती अनेक समस्या रोखू शकते आणि प्रत्येक परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाऊ शकते. चाणक्य नीतिनुसार या चार गोष्टी कोणालाही सांगू नये, अशा सूचना आचार्य यांनी केल्या आहेत. त्या चार गोष्टींविषयी जाणून घ्या.

पैशांची बाब

कोणी आपल्या कितीही जवळचे असेल, तरी आपण कधीही आपल्या संपत्तीबद्दल कोणाशीही चर्चा करु नये. आर्थिक नुकसान झाले असले तरीही आपण कोणालाही आपल्या आर्थिक स्थितीबद्दल सांगू नका, अन्यथा लोक आपल्या परिस्थितीचा फायदा घेतील.

दु:खाच्या गोष्टी

असे म्हणतात की दु:ख कोणाला सांगितल्याने ते कमी होते, परंतु आपण आपले दुःख प्रत्येकाला सांगू नये कारण बहुतेक लोक आपल्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचं नाटक करतात. ते आपल्या मागे आपली खिल्ली उडवतात.

पत्नीबाबत

आपली पत्नी चांगली असो की वाईट, आपण कोणत्याही व्यक्तीशी याबद्दल कधीही चर्चा करु नये. अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

अपमानास्पद गोष्ट

जर एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला असेल तर याचा उल्लेख कधीही कोणासमोर करु नये. असे केल्याने तुमची समाजातील प्रतिष्ठा कमी होते आणि तुमचा सामाजिक सन्मान कमी होतो.

Acharya Chanakya Said Never Share These Four Things To Anyone Who Close To You In Chanakya niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.