AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच

अनेकदा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात. या भांडणामुळे घर अशांत होतं. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, त्याचा फायदा तुम्हाला होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 8:11 PM
Share

अनेकदा घरात काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वाद होतो. वादाचं रुपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडणं होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात. अगदी शुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई-वडील जर दररोज भांडत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांच्या मनावर देखील होतो. भांडणामुळे आई-वडिलांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. परिणामी मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही. मुलं देखील सतत चिडचिड करतात. त्यामुळे अशी भांडणं टाळली पाहिजेत. भांडणाचं नेमकं कारण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. वास्तुशास्त्रात यावर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा एकटा तुमच्यावरच होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होतो. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घरावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, व्यवसायामध्ये तोटा होणं, एवढंच नाही तर काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत विनाकारण वाद होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. जर घरात पती-पत्नीचे सतत भांडणं होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.

जर पती -पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर अशावेळी दोन कोऱ्या कागदांवर प्रत्येकी सात लवंगा, सात विलायची, एक लमालपत्र घ्या. या सर्वांची व्यवस्थित पुडी बांधा. यातील एक पुडी ही पतीच्या उशिखाली ठेवा, आणि एक पुडी पत्नीच्या उशिखाली ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुडी सात दिवस त्या ठिकाणावरून हालवू नका. त्यानंतर आठव्या दिवशी या दोन्ही पुड्या जाळून टाका. सर्व प्रकारचा वास्तुदोष नाहीसा होईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. या उपायामुळे पती-पत्नीमधील भांडणं कमी होऊन घरात शांतता राहील असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.