AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच

अनेकदा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात. या भांडणामुळे घर अशांत होतं. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, त्याचा फायदा तुम्हाला होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 8:11 PM
Share

अनेकदा घरात काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वाद होतो. वादाचं रुपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडणं होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात. अगदी शुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई-वडील जर दररोज भांडत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांच्या मनावर देखील होतो. भांडणामुळे आई-वडिलांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. परिणामी मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही. मुलं देखील सतत चिडचिड करतात. त्यामुळे अशी भांडणं टाळली पाहिजेत. भांडणाचं नेमकं कारण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. वास्तुशास्त्रात यावर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा एकटा तुमच्यावरच होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होतो. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घरावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, व्यवसायामध्ये तोटा होणं, एवढंच नाही तर काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत विनाकारण वाद होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. जर घरात पती-पत्नीचे सतत भांडणं होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.

जर पती -पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर अशावेळी दोन कोऱ्या कागदांवर प्रत्येकी सात लवंगा, सात विलायची, एक लमालपत्र घ्या. या सर्वांची व्यवस्थित पुडी बांधा. यातील एक पुडी ही पतीच्या उशिखाली ठेवा, आणि एक पुडी पत्नीच्या उशिखाली ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुडी सात दिवस त्या ठिकाणावरून हालवू नका. त्यानंतर आठव्या दिवशी या दोन्ही पुड्या जाळून टाका. सर्व प्रकारचा वास्तुदोष नाहीसा होईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. या उपायामुळे पती-पत्नीमधील भांडणं कमी होऊन घरात शांतता राहील असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?