AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय

अनेकदा असं होतं की आपल्यासाठी एखादं खूप महत्त्वाचं काम असतं. परंतु ते काम पूर्ण होत नाही. या कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण होतात. असं घडू नये, आणि आपलं काम कुठल्याही अडथळ्याविना लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय
VASTUSHTRA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 9:13 PM
Share

अनेकांसोबत असं होतं की, त्या व्यक्तीसाठी एखादं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे काम कधी पूर्ण होईल याची वाटच तो व्यक्ती बघत असतो. परंतु जेव्हा असं वाटतं की आता हे काम होत आलं आहे, लवकरच त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे, अशा वेळी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि ते काम अपूर्ण राहतं. अशावेळी खूप निराश व्हायला होतं. मात्र असं आपल्यासोबत का घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे आहे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की घरात पैसा टिकत नाही, भांडणं होतात. एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सूर्याला जल अर्पण करा – वास्तुशास्त्रानुसार दररोज सूर्य देवतेला जल अर्पण केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. दररोज पहाटे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. अंघोळ करावी अन् उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. यावेळी सूर्यमंत्राचा जप देखील करावा. तसेच सूर्याला एखादं लाल फूल देखील अर्पण करावं. यामुळे तुमच्या पाठिमागचे सर्व कष्ट दूर होतात. तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर त्यातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हनुमानाला नारळ अर्पण करा – अनेकदा काय होतं की आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु आपलं चांगलं चालेलं काही लोकांना देखवत नाही, असे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात. त्यामुळे त्यांची नजर आपल्याला लागते. अशावेळी होत काय तर नजर लागल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडळथे निर्माण होण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, दर मगंळवारी भगवान हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांना एक नारळ अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होऊन, तुमचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?