AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय

अनेकदा असं होतं की आपल्यासाठी एखादं खूप महत्त्वाचं काम असतं. परंतु ते काम पूर्ण होत नाही. या कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण होतात. असं घडू नये, आणि आपलं काम कुठल्याही अडथळ्याविना लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय
VASTUSHTRA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 9:13 PM
Share

अनेकांसोबत असं होतं की, त्या व्यक्तीसाठी एखादं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे काम कधी पूर्ण होईल याची वाटच तो व्यक्ती बघत असतो. परंतु जेव्हा असं वाटतं की आता हे काम होत आलं आहे, लवकरच त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे, अशा वेळी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि ते काम अपूर्ण राहतं. अशावेळी खूप निराश व्हायला होतं. मात्र असं आपल्यासोबत का घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे आहे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की घरात पैसा टिकत नाही, भांडणं होतात. एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सूर्याला जल अर्पण करा – वास्तुशास्त्रानुसार दररोज सूर्य देवतेला जल अर्पण केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. दररोज पहाटे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. अंघोळ करावी अन् उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. यावेळी सूर्यमंत्राचा जप देखील करावा. तसेच सूर्याला एखादं लाल फूल देखील अर्पण करावं. यामुळे तुमच्या पाठिमागचे सर्व कष्ट दूर होतात. तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर त्यातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हनुमानाला नारळ अर्पण करा – अनेकदा काय होतं की आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु आपलं चांगलं चालेलं काही लोकांना देखवत नाही, असे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात. त्यामुळे त्यांची नजर आपल्याला लागते. अशावेळी होत काय तर नजर लागल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडळथे निर्माण होण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, दर मगंळवारी भगवान हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांना एक नारळ अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होऊन, तुमचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा