AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय

अनेकदा असं होतं की आपल्यासाठी एखादं खूप महत्त्वाचं काम असतं. परंतु ते काम पूर्ण होत नाही. या कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण होतात. असं घडू नये, आणि आपलं काम कुठल्याही अडथळ्याविना लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय
VASTUSHTRA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 9:13 PM
Share

अनेकांसोबत असं होतं की, त्या व्यक्तीसाठी एखादं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे काम कधी पूर्ण होईल याची वाटच तो व्यक्ती बघत असतो. परंतु जेव्हा असं वाटतं की आता हे काम होत आलं आहे, लवकरच त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे, अशा वेळी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि ते काम अपूर्ण राहतं. अशावेळी खूप निराश व्हायला होतं. मात्र असं आपल्यासोबत का घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे आहे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की घरात पैसा टिकत नाही, भांडणं होतात. एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सूर्याला जल अर्पण करा – वास्तुशास्त्रानुसार दररोज सूर्य देवतेला जल अर्पण केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. दररोज पहाटे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. अंघोळ करावी अन् उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. यावेळी सूर्यमंत्राचा जप देखील करावा. तसेच सूर्याला एखादं लाल फूल देखील अर्पण करावं. यामुळे तुमच्या पाठिमागचे सर्व कष्ट दूर होतात. तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर त्यातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हनुमानाला नारळ अर्पण करा – अनेकदा काय होतं की आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु आपलं चांगलं चालेलं काही लोकांना देखवत नाही, असे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात. त्यामुळे त्यांची नजर आपल्याला लागते. अशावेळी होत काय तर नजर लागल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडळथे निर्माण होण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, दर मगंळवारी भगवान हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांना एक नारळ अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होऊन, तुमचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत