AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? सतत आर्थिक समस्या येतायेत? मग करा हा सोपा उपाय

जेव्हा तुमच्या घरात नकारात्म ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच एका उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? सतत आर्थिक समस्या येतायेत? मग करा हा सोपा उपाय
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 25, 2026 | 10:30 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार मिठाला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळेच कधीही संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये, त्यामुळे घरात गरीबी येते असं मानलं जातं. मिठाला सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत देखील मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये मिठाचे असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील नकरात्मक ऊर्जा कमी करू शकता. ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात सैंधव मिठाला विशेष महत्त्व आहे. सैंधव मीठ हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर या मिठाचा वापर करून आपण आपल्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा देखील कमी करू शकतो. अनेकांच्या आयुष्यात विविध समस्या असतात, जसं की कोणाच्या हातात पैसा टिकत नाही, कोणाच्या घरी सारखी भांडणं होतात, त्यामुळे ताण तणाव वाढतो. अनेकदा तुम्हाला घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागते. या समस्या समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात सैंधव मिठासंबंधित काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

राहु -केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी – राहु, केतू हे छायाग्रह आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहु किंवा केतूचा दोष निर्माण झाला असेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. महत्त्वाच्या कामांमध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात. चिडचिड वाढते, मन अस्वस्थ होतं. त्यामुळे कुंडलीतील राहु, केतूचा प्रभाव टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार सैंधव मिळाचे दोन छोटे भांडे भरून घ्या आणि ते तुमच्या घराच्या वायव्य दिशेला ठेवा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचा वास्तुदोष नष्ट होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आर्थिक समस्या – अनेकदा असं होतं की आपणं प्रचंड कष्ट करतो, परंतु आपल्या हातात पैसाच टिकत नाही. याला कारणीभूत तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा देखील असू शकतो. अशावेळी वास्तुशास्त्रात सांगितलेला सैंधव मिठाचा सोपा उपाय करावा. एका काचेच्या भांड्यामध्ये मिठ भरावं आणि ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ वायव्य दिशेला ठेवावं, यामुळे सर्व दोष नष्ट होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!