AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर या 3 गोष्टी दिसल्या, तर समजून जा नशीब फळफळणार, घरात होणार धनाचा वर्षाव

वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं.

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर या 3 गोष्टी दिसल्या, तर समजून जा नशीब फळफळणार, घरात होणार धनाचा वर्षाव
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 4:59 PM
Share

हिंदू धर्माशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे, वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराशी संबंधित नाही, म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? कोणत्या दिशेला नसावा? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? देवघर कोणत्या दिशेला असावं? तुमच्या घरातील तिजोरी कोणत्या दिशेला असावी? कोणत्या दिशेला नसावी? याबाबत तर मार्गदर्शन केलंच आहे. मात्र त्यासोबतच अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंध येतो. वास्तुशास्त्रानुसार जर या गोष्टी योग्य पद्धतीनं न केल्यास अनेक संकट निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक आपल्या वास्तुची निर्मिती करण्यापूर्वी वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात काय असावं आणि काय असू नये? याबद्दल देखील सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, त्या वस्तू घरात ठेवता कामा नये असं वास्तुशास्त्र सांगतं. जर उदाहरण द्यायचं झालं तर घरात असलेलं भंगार सामान, कचरा अशा गोष्टी. यामुळे घरात नकारात्मक ऊर्ज तयार होते असं वास्तुशास्त्र सांगतं.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला लवकरच पैशांची प्राप्ती होणार आहे, तुमच्या घरावर धनाचा वर्षावर होणार आहे, याचे ते संकेत असतात. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे.

मुंगूस – वास्तुशास्त्रानुसार मुंगूस आहे एक शुभ प्राणी आहे, ज्याला भगवान विष्णूचं प्रतीक मानलं गेलं आहे, जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुंगूसाचं दर्शन झालं तर तो एक शुभ संकेत असतो.

भरतद्वाज पक्षी – हा पक्षी देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे, वास्तुशास्त्रानुसार सकाळी जर या पक्ष्याचं दर्शन झालं तर घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरामध्ये पैसे येतात.

देवी देवतांचे फोटो, किंवा मुर्ती – वास्तुशास्त्रानुसार जर सकाळीच तुम्हाला देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्तीचं दर्शन झालं तर ते अत्यंत शुभ असतं. तुमचे सर्व कष्ट दूर होतात.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?