AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : दुसऱ्या घरात शिफ्ट होताना जुन्या घरातील या वस्तू कधीच नेऊ नयेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?

अनेकजण नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणाने आपलं राहतं घर बदलून दुसर्‍या घरात किंवा शहरात राहायला जातात. अशा वेळी काही विशिष्ट वस्तू असतात, त्या आपल्या जुन्या घरातून नवीन घरात कधीच नेऊ नयेत, यामुळे नव्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : दुसऱ्या घरात शिफ्ट होताना जुन्या घरातील या वस्तू कधीच नेऊ नयेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 9:59 PM
Share

अनेकजण नोकरीच्या निमित्ताने किंवा दुसर्‍या काही कामाच्या निमित्ताने आपलं पूर्वीचं राहतं घर बदलतात, ते नव्या घरात शिफ्ट होतात. तसेच जे लोक भाड्याने राहत असतात असे लोक देखील ठरावीक कालावधीने आपलं घर बदलत असतात. वास्तुशास्त्रानुसार अशावेळी आपल्या जुन्या घरातील काही वस्तू या चुकूनही नव्या घरात नेता कामा नये, यामुळे नव्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडू शकतो. अशा वस्तू जुन्या घरातून नव्या घरात नेणे हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. त्यामुळे अशा वस्तू एक तर जुन्या घरीच ठेवाव्यात किंवा कुठेतरी दूर टाकून द्याव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात नेमक्या या वस्तू कोणत्या आहेत? आणि या वस्तू जर तुम्ही सोबत आणल्या तर त्याचा काय परिणाम होतो?

झाडू – वास्तुशास्त्रानुसार जुन्या घरातील झाडू कधीही नव्या घरात शिफ्ट होताना सोबत नेऊ नये, कारण यामुळे आर्थिक मार्गात अडथळे निर्माण होतात, एखाद्या महत्त्वाच्या कामाला विलंब लागू शकतो, तसेच इतरही काही अडचणी निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या घरात शिफ्ट होताना कधीही झाडू सोबत घेऊन जाऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला वेळ आणि गतीचं प्रतिक माण्यात आलं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे धावत राहतात, त्याचप्रमाणे तुमचं नशीब देखील धावत राहतं. तुम्हाला प्रगतीच्या नव नवीन संधी उपलब्ध होतात. आर्थिक प्रगती साधली जाते. परंतु जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते अशुभ माण्यात येतं. त्याचा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर होत असतो. त्यामुळेच घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, तसेच जेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठे तुमचं घर शिफ्ट करणार आहात, तिथे देखील हे असं बंद पडलेलं घड्याळ नेऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

औषधे – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नव्या घरात तुमचं सामान शिफ्ट करता तेव्हा कधीही जुन्या घरातून नव्या घरात औषधे नेऊ नयेत, यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कारण औषधाचा संबंध हा तुमच्या आरोग्याशी असतो.

रद्दी व टाकावू वस्तू – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नव्या घरात शिफ्ट होतात, तेव्हा त्या घरात कधीही जुन्या घरातून रद्दी सामान आणि टाकावू वस्तू नेवू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी